एकूण शालाबाह्य मुलांची संख्या 553 : मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
गौरी आवळे / सातारा :
कोरोनाच्या काळात संपूर्ण देशभरात कामगार कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. यामुळे लाखो विद्यार्थी शाळेपासून दुरावले आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने या शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण सुरूवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात शालाबाह्य मुलांची एकून संख्या 553 आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान, व गळती थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनाने जनजीवन बदलून टाकले. यांचा सर्वात जास्त फटका गरीब-गरजुंना कुटुंबाना बसला आहे. रोजगार गेल्याने अनेक कुटुंब मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झाले. यामुळे मुलांची शिक्षणातील गळती वाढली आहे. मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात मुलांचे प्रमाण 48, मुलींचे 58 आहे. कोरेगाव मुले 51, मुली 41, खटाव मुले 4, मुली 2, माण मुले 11, मुली 1, फलटण 39, मुली 35, खंडाळा मुले 17, मुली 14, जावली मुले 2, मुली 1, वाई मुले 68, मुली 41, महाबळेश्वर मुले 0, मुली 0, कराड मुले 64, मुली 44, पाटण मुले 8, मुली 4 अशी एकूण संख्या 553 आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत महाबळेश्वर मध्ये शालाबाह्य मुलांची संख्या 0 आहे. या मुलांचे सर्वेक्षण सूक्ष्मदर्शी होणे गरजेचे आहे.