अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 20 एप्रिल 21, दुपारी 12.15
● बाधित वाढीचा नवा उच्चांक ● सोमवारी रात्री अहवालात 1,571 बाधित● पॉझिटिव्हिटी रेट 33.64 ● 4,408 जणांची तपासणी ● वाटचाल कडक लॉकडाऊनकडे● मृत्यूदर वाढल्याने जिल्ह्यात भीती ● अत्यावश्यक दुकानांबाबत अद्याप निर्णय नाही
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात 11 एप्रिल पासून हजारोंच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ आणि त्यातच सुरू झालेला लॉकडाऊन यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरु झालाय मात्र 17 एप्रिल रोजी जिल्ह्यात 1,543 एवढी गत वर्षभरातील उच्चांकी बाधित वाढ समोर आली होती. त्यानंतर दोन दिवस थोडासा वेग मंदावला असतानाच सोमवारी रात्री च्या अहवालात बाधित वाढीने नवा उच्चांक प्रस्थापित केला असून तब्बल 1,571 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या नव्या उच्चांकी आकडेवारीने जिल्ह्याला अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचा संदेश परिस्थिती देऊ लागली आहे.
बाधित वाढ रोखण्याचे आव्हान
जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंताजनक ठरू लागली आहे. मात्र शुक्रवारच्या उच्चांकी 1,543 आकड्या नंतर शनिवारी 1,395 रविवारी 1,434 तर सोमवारी 1,212 अशी बाधित वाढ समोर आली. त्यातच एकाच दिवशी तब्बल 41 बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हा हादरला असतानाच मंगळवारी तब्बल 1,571 बाधित वाढीचा नवीन उच्चांक प्रशासनासह नागरिकांसमोर नवीन आव्हान निर्माण करणारा ठरला आहे.
अत्यावश्यक दुकानात बाबत निर्णय नाही
जिल्ह्यातील वाढता कोरुना संसर्ग पाहता सरकारी खाजगी कार्यालय बँक यांचे वेळापत्रक सकाळी नऊ ते दुपारी दोन करण्यात आलेले आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील दुकानांबाबत निर्णय झालेला नाही राज्य सरकारने मात्र अत्यावश्यक सेवेतील दुकानांचा वेळेचा निर्णय सकाळी सात ते अकरा असा केलेला आहे. मात्र जिल्ह्यात त्याबाबत निर्णय झालेला नाही.
सोमवारी रात्री अहवालात 1,571 बाधित
मागील दोन-तीन दिवसातील उच्चांकी आकडेवारी नंतर मंगळवारी सकाळी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अहवालात 1,571 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या अहवालानुसार एकूण 4 हजार 408 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,571 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 35.64 असा आहे. जिल्ह्यात सातारा 606, खटाव 531, खंडाळा 557, कोरेगाव 479, फलटण 495, कराड 385, महाबळेश्वर 318, वाई 247, माण 175, जावली 113, आणि पाटण 57 अशी गेल्या पंधरा दिवसात बाधित झालेल्यांची आकडेवारी आहे. यामध्ये सातारा, खंडाळा खटाव कोरेगाव फलटण, कराड, महाबळेश्वर, वाई तालुक्यांना सावरण्याची गरज आहे.
मंगळवारी 1,572 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज तरी मृत्यूदरात वाढ होऊ नये अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. मात्र त्याची सविस्तर माहिती काही वेळात मिळेल.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने -4,74,673, एकूण बाधित -82,955, घरी सोडण्यात आलेले -67,329, मृत्यू -2,155 उपचारार्थ रुग्ण-13,471, सोमवारी कोरोनामुक्त 381, बळी 41