प्रतिनिधी / सातारा
कोरोना आला अन् सर्वात मोठा फटका बसला तो पर्यटन क्षेत्रावर. जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळे गेल्या दीड वर्षापासून पर्यटकांचा नजरे पलीकडेच होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील कोरोनाचा आलेख कमी होत असल्याने बहुतांश निर्बंध हे शिथिल केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठोसेघर परिसरात “पर्यटकांचा बहर” आल्याचे चित्र तब्बल दीड वर्षा नंतर पाहायला मिळत आहे.
सातारा बोगदा मार्गे ठोसेघर कडे निघाले की प्रथम दर्शन होते ते किल्ले सज्जनगड. तद्नंतर यापुढे गेल्यानंतरच घाट रस्ते तसेच डोंगरांनी हिरवा शालू नेसलेला हे निसर्ग सौंदर्य खरंच डोळ्याचे पारणे फेडते. त्याचबरोबर असलेली भातशेती आणि त्यातूनच वाट काढत चाललेला आपला ठोसेघरचा प्रवास मन अगदी तृप्त होऊन जाते. धबाबा कोसळणारा हा ठोसेघरचा धबधबा जणू फेसाळलेले दूधच. हे पाहण्यासाठी पर्यटकांच्या उड्या या भागात पडू लागल्या आहेत. दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी कोरोणाचे नियम पाळत निसर्गाचा आनंद घेत आहेत. अधून मधून सुरु असलेल्या ऊन पावसाचा खेळ पर्यटकांना मोहित करत आहे.
गेल्या दीड वर्षांपासून ठोसेघर परिसरात आणि पावसाळ्यातही शांतता पाहायला मिळत होती कारण साताऱ्यातील कोरोनाची दाहक ताच् एवढी होती. त्यामुळे तेथील पर्यटन क्षेत्र वरील आधारित असलेले व्यवसाय हे ठप्प होती. अन मिळणारे थोडेफार का होईना उत्पादन हे बंद झाले होते मात्र हा आकडा जसजसा कमी होत चालल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. आणि पुन्हा एकदा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र जोर धरू लागला आहे. त्याचबरोबर त्यावरील आधारित असलेली व्यवसायदेखील सुरू झाले आहेत.