प्रतिनिधी / सातारा
वेडाच्या भरात घरातून निघून गेलेला पालघर जिल्ह्यातील कोसबाड गावचा सज्जन उर्फ विष्णु बावल्या रोज हा तब्बल सात वर्षांनी त्याच्या कुटूंबियांना भेटला. ही भेट घडवून आणली यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे रवी बोडके यांनी त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
सात वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यातील साजन हा निघून गेला होता. त्याच्या कुटूंबियांनी शोधून ही न सापडल्याने त्याचा दहावा, तेरावा घातला होता.पण म्हणतात ना देव आहे. गेल्याच आठवड्यात यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे रवी बोडके यांनी चार जणांची सुटका केली होती. त्यातील एकाने आपली माहिती बोडके यांना दिली. बोडके यांनी त्या साजनला त्याच्या गावी पोहचले. साजनची मुलगी, पत्नी, मुलगा यांनी खूप खूप आभार मानले.