सातारा : राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आज सुरू आहेत. निकालाच्या ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांनी तुडुंब गर्दी केली आहे. निकाल केंद्राबाहेर आणि प्रत्यक्ष निकाल केंद्रात ही प्रतिनिधींची गर्दी झाली आहे. मात्र, प्रशासन डोळे बंद करून बसले आहे.
काही दिवसांनी साताऱ्यात बाधितांचा आकडा शंभरीचा आत आला आहे. मात्र, आजची गर्दी पहाता आणि प्रशासनाची भूमिका पाहता नक्कीच हा आकडा येत्या दिवसात वाढण्याची शक्यता आहे.