कुडाळ / प्रतिनिधी :
गेल्या काही वर्षापासून पाचगणी स्वच्छतेमध्ये देशात क्रमांक मिळवत असल्याच्या घटना आधी ताजा असल्या तरी व देशात स्वच्छतेत डंका दिल्लीपर्यंत गाजवणार्या पाचगणी नगरपालीकेची स्वच्छतेत १४ वा क्रमांक आल्याने हे स्वच्छतेचे पाप घालवण्याच्या पाठीमागचे पाप नेमके कोणाचे असा प्रश्न आता पाचगणी जनता विचारू लागली आहे . पाचगणी नगरपालीकेची स्वच्छतेत झालेली घसरण नगरपालीकेच्या कारभारनी बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होवु लागला आहे
कोट्यावधी रुपयांचा निधी पाचगणीच्या स्वच्छतेवर खर्च करून देखील अद्यापही पहिल्या क्रमांकावरून थेट चौदाव्या क्रमांकावर ची झालेली घट या पाठीमागचे नेमक कारण काय असा सवाल ही देखील आता उपस्थित होऊ लागला आहे
पाचगणी नगरपालीकेची स्वच्छतेची गंधी बात झाली च कशी कोण याला जबाबदार . पाचगणी नगरपालीकेतील राजकारण टक्केवारीसाठी नगरसेवकाच्या आतील आपआपसातील लढाया नगरसेवकांची अंतर्गत कुरघोडी या सर्व बाबी मुळे स्वच्छतेत घसरण झालेली घसरण व स्वच्छतेसाठी आलेला कोट्यावधीचा निधी पुन्हा पाण्यात गेला असल्याचे दिसून आले या सर्व नुकसानीला नगराध्यक्ष जबाबदार कि राजकारण जबाबदार असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला आहे जबाबदार कोणी असले तरी नुकसान मात्र पाचगणीच्या जनतेचे झाले त्यामुळे या सर्व घटनेला नगराध्यक्षांनी आता सक्षम पणे जबाबदारी घेऊन उत्तर द्यावे अशी मागणीही पाचगणीच्या जनते कडून होऊ लागली आहे.
नगराध्यक्ष सह पालिकेच्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी . पाचगणीच्या सर्व नगरसेवकांनी स्वार्थाचे राजकारणाकरीता शहराच्या नावलैाकीकाला बाधा येईल असे कुरघोडीचे राजकारण केले .याचा फटका पाचगणी शहराची स्वच्छतेत घसरणीची प्रमुख कारण समोर आले आहे . सर्वसामान्य जनतेने जगात नावलैाकीक असलेल्या गिरीस्थान नगरपालीकेचे सदस्य यांना विकासकरिता निवडुन दिले असताना . जिरवाजीरवीचे राजकारण करत पाचगणी शहराची स्वच्छतेत घसरण लपुन राहीले नाही . नरेंद्र मोदी पासून अभिनेता अमिताभ बच्चन तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या बरोबर पाचगणीच्या स्वच्छतेचे धडे गिरवत अनेक फोटो स्पेशल झाले त्या यशाने हुरळून जाऊन पाचगणी साठी व स्वच्छतेसाठी केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून दिला गेलेला निधीचा यावेळी मात्र प्रत्यक्षात कुठे उपयोग झाला ?
हे मात्र कोरोनाव्हायरस च्या संक्रमणात मनात व पाचगणीत पावसाळ्यापूर्वी पडलेला धुक्यात सगळे हरवून गेले
पाचगणी शहराच्या प्रथम नागरीक लक्ष्मी कराडकर यांना यश टीकवता आले नाही . नगरसेवकांची बहुमोल साथ मिळाल्यामुळे पाचगणी शहराचा प्रथम क्रमांक पटकवण्याच यश मिळवलं होत हे सुद्धा घसरणीवरून लपुन राहीले नाही . डीजीटल कचरा डब्बा निर्मुलन , सॅनिटरी पॅड मशीन्स. , अद्यावत कचरा निर्मुलन स्वच्छ भारत पाॅईट , ई टाॅयलेटस अशा अनेक बाबींवर पाचगणी नगरपालिकेने कोट्यावधी रुपायाची उधळन केली . मात्र “फटी पोस्टर निकली झिरोइन “ अशी अवस्था स्वच्छतेत झालेल्या घसरणीवरून लपुन राहीले नाही .
पाचगणी शहरातील नगरसेवक व नगराध्यक्ष पाचगणीचा नावलौकीक अबाधित ठेवण्यातरीता कमी पडले असल्याची सल सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये दिसत आहे . पाचगणी नगरपालीकेची स्वच्छतेत झालेली घसरण व नगरपालीकेचा अवाढव्य विकास योजना याच समिकरण नक्की कोणासाठी व कशासाठी अशी वेळ पाचगणीत येवुन ठेपली आहे . त्यामुळे नंबर वन पासून 14 वे नंबर वर झालेली घसरणीचे हे पाप नेमके कोणाच्या माती आता मारायचे असा सवाल देखील आता पाचगणी की जनता विचारू लागली आहे