प्रतिनिधी / सातारा :
राजवाडा मंडई परिसरात राजकीय वरदहस्ताने मटक्याची टपरी सुरू होती. पालिकेच्या जागेत असलेल्या या टपरीची तक्रार मुख्याधिकारी बापट यांच्याकडे येताच अतिक्रमण विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कारवाई करुन टपरीच उचलून आणली. त्यामुळे मटका घेणाऱ्याची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसत होते.
राजवाडा परिसरात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी मटका बुकी हाताहाताच्या अंतरावर पहायला मिळतात. काहीजण राजकीय वरदहस्ताने पालिकेच्या जागेत या टपऱ्या चालवतात. अशाच एका मटका फंटरने टपरी टाकल्याची तक्रार पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे आली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करुन टपरी हटवली.