प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोरोना बाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य केले जाते. त्या करिता लाकूड पुरवठा हा कदम यांच्या वखारीतून केला जात होता. त्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यानी केली होती. त्यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी लगेच कार्यवाही करून लाकूड पुरवठा करणारा ठेकेदार बदलला अन अग्नि कुंडात लाकूड किती टाकले जाते यासाठी एका अधिकाऱयाची नियुक्ती केली आहे. पारदर्शकपणा आणला गेला आहे.
शहरात दररोज कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. शहरातील हॉस्पिटलमध्ये अनेक बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. त्या मृतांवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्याकरिता पालिकेकडून लाकूड पुरवठा व कर्मचारी सुविधा पुरवण्यात येतात. याच लाकूड पुरवठय़ात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावरून पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने लगेच लाकूड पुरवठा करण्याचे टेंडर काढण्यात आले. टेंडर काढण्यापूर्वी जो लाकूड पुरवठा करणारा होता त्याच्याकडून काढून अन्य ठेकेदाराला ठेका देण्यात आला. तसेच त्या ठिकाणी लाकूड किती प्रमाण अग्निकुंडात टाकले जाते. ते मोजण्यासाठी पालिकेचा अधिकारी नेमण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रत्येक अंत्यसंस्कार करतेवेळी लाकूड मोजले जात आहे. पारदर्शकपणा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आणला आहे. दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयास मात्र बदली करण्याऐवजी अजून ही त्या अधिकाऱयाकडे आरोग्य विभागाचा कार्यभार आहे. त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.