प्रतिनिधी / सातारा
गेल्या वर्षा पासून आपण सर्वच लोक आपले धार्मिक सण अगदी साधे पणाने साजरे करत आहोत यात सर्वच धर्मातील लोकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे या पुढे ही करतील येत्या 21 जुलै रोजी मुस्कीम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आहे या वेळी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे कोठेही गर्दी करू नये, ईदची नमाज घरीच अदा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखरसिंह दलाल यांनी केले.
सातारा जिल्हा शांतता कमिटीची पोलीस प्रशासना कडून बकरी ईद पार्श्वभूमीवर मिटिंग आयोजित करणयात आली होती या वेळी जिल्हाधिकारी शेखरसिंह जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, नगराध्यक्ष माधवी कदम, डी वाय एस पी आंचल दलाल, प्रांताधिकारी,नगरपरिषद मुख्याधिकारी अभिजित बापट, शहर पोलीस प्रमुख अण्णासाहेब मांजरे,तालुका पोलीस अधिकारी सजन हंकारे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी शाफिक शेख, सादिक बेपारी, नरेंद्र पाटील, मुक्तार पालकर, सादिक बेपारी, मुरलीधर भोसले, सतीश रावखंडे, अमजद सय्यद, इरफान बागवान, दत्तात्रय पवार, शिवाजी चव्हाण, दिनेश कदम आदी जिल्हा शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.