सातारा / प्रतिनिधी :
शहरातील रस्त्याच्या कामात अडथळा ठरलेली भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टीतील रिकामी घरे हटविण्यास पालिकेने आज सकाळी सुरुवात केली.
मागील आठवड्यात जिल्हा परिषद चौक ते सदर बाजारमधील रस्त्याच्या कामाची पाहणी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केली होती. त्यावेळी रस्त्याच्या कामात अडथळा येणाऱ्या झोपड्या काढून घ्या, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आपले घरांमधील साहित्य काढून घेतले. आज मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण हटाव विभागाचे प्रशांत निकम यांनी मोकळ्या झोपड्या हटवायचे काम सुरू केले.