सातारा / प्रतिनिधी :
रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील निगवणीचे उद्योजक संदीप शांताराम कदम (वय 36) यांच्या खुनाचे रहस्य अद्याप उलगडले नाही.
कदम हे दि. 22 डिसेंबरपासून कल्याणमधून बेपत्ता झाले होते. त्याचा मृतदेह मांढरदेव घाटात दि. 29 रोजी सकाळी पावणे अकरा वाजता आढळून आला होता. या खुनाचा तपास ठाणेचे स्थानिक गुन्हे अन्वेषण करत असून, अद्यापही पोलिसांना त्याचे धागेदोरे मिळाले नाहीत. येत्या दोन दिवसात छडा लागेल, असे ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितले.
दरम्यान, ट्रव्हल्स एजन्सीच्या मालकास मांढरदेव घाटात आणून खून करण्यामागे नेमके रहस्य काय याकडे जिल्हावासियांच्या नजरा आहेत. कदम यांचा शेवटचा फोन कॉल दि.21 रोजी रात्री 9.30 वाजता झाला होता. त्यानंतर याचा फोन बंद झाला. तशी मिसिंगची तक्रार कल्याण ग्रामीणमध्ये दाखल आहे. कल्याण ग्रामीण पोलिसांनी ठाणे स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासाठी हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. या पथकाकडून गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.