प्रतिनिधी / सातारा
कोविड १९ च्या प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत आहे. लोकांना आरोग्याविषयी माहिती व्हावी. कोविड १९ चा संसर्ग होवु नये व झाला तर कोणती काळजी घ्यायची हेच एकमेव उदिद्ष्ट ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ या शासनाच्या योजना आहे.
लोकांमध्ये कोविड १९ च्या संशयित रुग्णांचा तात्काळ शोध घेण्याकरीता ५० कुटुंबामागे एक टीम नियुक्त करण्यात आली असून येणार्या काळामध्ये कोरोनाचा बिमोड करुन प्रत्येकाच्या घरांपर्यंत पोहचवणार. कोविड १९ त्या संशयित रुग्णांना शोधून या मोहिमेत उपचार दिले जाणार व लोकांमध्ये आरोग्याविषयी शिक्षण दिले जाणार असल्याचे प्रतिपादन व जनतेला आवाहन सातारा जावलीचे प्रांत मिनाज मुल्ला केले आहे.