प्रतिनिधी / सातारा
राजवाडा परिसरात कोणीही काहीही करू लागले आहे. येथील अजिंक्य गणेश मंदिर परिसरात चक्क नगराध्यक्षा माधवी कदम यांनी बसवलेले लोखंडी बाकडे एका दुकानदाराने पळवले अन् तेथे पावभाजीची गाडी सुरू करण्यात आली आहे. हे सगळं नेमकं काय सुरू आहे, याचीच चर्चा रंगू लागली आहे.
राजवाडा परिसरात विशेष करून चांदणी चौक परिसरात अतिशय काला झाला आहे. पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तर सगळाच घनशा घोळ आहे. त्यातच अजिंक्य गणेश मंदिराच्या बाजूला एक लोखंडी बाकडे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी बसवले होते. ते बाकडे येथील व्यावसायिकाने पळवले. त्या जागी अनाधिकृत पाव-भाजी ची टपरी टाकली.याला वरदास्त कोणाचा आहे हे कळत नाही. यावर पालिका अतिक्रमण विभाग कारवाई करणार का ?,अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते करू लागले आहेत.