प्रतिनिधी/नागठाणे
पिलाणी (वरची, ता. सातारा) येथे रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी आज वन विभागाच्या पथकाने सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. गोविंद विष्णू साळुंखे, दत्तात्रय किसन चव्हाण, बाबुराव बाळकू पन्हाळे, अरुण प्रभाकर साळुंखे, शिवाजी बंडू साळुंखे, राजेंद्र रामचंद्र साळुंखे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यावेळी त्यांच्याकडून पाच किलो मांस व शिकारीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागठाण्याच्या पश्चिमेस असलेल्या डोंगरउंचावरील नरेवाडी, पिलाणी (वरची) या गावच्या परिसरात आज पहाटे चार वाजता शिकारीचा प्रकार घडला. त्यानंतर विभागाच्या पथकाने प्रथम गोविंद साळुंखे, दत्तात्रय चव्हाण, बाबुराव पन्हाळे या तिघांना राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, अरुण प्रभाकर साळुंखे, शिवाजी बंडू साळुंखे, राजेंद्र रामचंद्र साळुंखे हे तिघे संशयीत पळून गेले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर तपास पथकाने त्यांना डोंगरात जाऊन पकडले.
परिमंडळ
वनाधिकारी योगेश गावित यांच्या
मार्गदर्शनाखाली राज मोललगी,
संतोष काळे, संजय
धोंडवड, मारूती
माने, रणजित काकडे,
प्रशांत पडवळ, महेश
सोनावले, संतोष
दळवी, सुहास मोरे,
शेखर चव्हाण, श्रीरंग
पवार, लक्ष्मण धनावडे
यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
उपवनसंरक्षक भारतसिंह
हाडा, सहायक वनसंरक्षक
विश्वास भडाळे, वनक्षेत्रपाल
शीतल राठोड यांनी सर्वांचे
अभिनंदन केले.