सातारा / प्रतिनिधी
सातारा येथील रामाच्या गोटात रहिवासी भागात तब्बल दोन मोबाईल टॉवर उभारण्याचा घाट घातला असून नागरिकांपर्यंत रेडिएशनचा पोहचण्याची शक्यता आहे. शासकीय सुट्टीच्या काळात हा मोबाईल टॉवर उभारला जात आहे. त्याची चौकशी करून हा टॉवर उभारण्यात येऊ नये, अशी मागणी तेथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
रामाचा गोट येथे अगोदर एक मोबाईल टॉवर उभा आहे. तो ही रहिवासी भागात उभा केला असून आता दुसरा टॉवर ही त्याच परिसरात उभारण्याचे काम सूरु आहे. या मोबाईल टॉवरमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मोबाईल टॉवरचे काम थांबवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.