प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून लॉकडाऊन लागू झाले. या लॉकडाऊनमुळे बहुतांश नागरिक घरीच अडकले आहेत. यामुळे शारीरिक हालचालीं कमी झाल्याने पोटदुखीचा आजार वाढला आहे. 25 ते 50 या वयोगटातील नागरिकांना यांचा जास्त त्रास होत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत आर्थिक अडचणी तसेच आरोग्याच्या समस्येमुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत. चहा, कॉफी किंवा अल्कोहोलचे अतिसेवन केल्याने झोपेच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. घरबसल्या लोक अधिक तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खातात. आणि शारीरिक हालचाली मात्र मंदावल्या आहेत. यामुळे बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव निर्माण झाला. अनेकांना छातीत जळजळ, पोटात दुखणे, मळमळणे, गिळण्यास अडचणी, पोट खराब होणे या लक्षणांसह एसोफेजियल रिफ्लक्स(जीईआरडी) सारख्या पोटांच्या आजारांनी ग्रासले आहे. या कारणांमुळे नागरिकांमध्ये पोटाच्या तक्रारी जाणवू लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. लॉकडाऊनमध्ये या आजारांच्या रूणांमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तणाव मुक्तीचाही फायदा
पोटाचे आजार टाळण्यासाठी पोषक आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, प्रमाणात अन्नपदार्थ खावेत, आणि रात्री उशिरा जेवण टाळावे. जेवणानंतर लगेच झोपू नयेत. कॉफीचे सेवन प्रमाणात करावेत. तसेच तणावमुक्त जीवनशैली असल्यास त्याचाही फायदा होत आहे.
अपचन होणारे पदार्थ खाणे टाळा
लॉकडाऊनमुळे जीवनशैलीत बदल झाला असून आहारात पालेभाज्या, फळभाज्या खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बेकरी प्रोडक्टचा आहारात समावेश झाल्याने यांचा दुष्यपरिणाम आरोग्य होत आहे. पोटदुखीचा त्रास कमी करण्यासाठी घरावरच्या टेरेसवर चालणे, सकाळी योगा करणे, कोमट पाणी पिणे, बाहेरील पदार्थ खाणे टाळणे यामुळे पोटाचे आजार वाढणार नाहीत.
डॉ. संदीप निकम, श्री सेवा हॉस्पिटल गोडोली