प्रतिनिधी / खंडाळा
कांद्यावरील निर्यात बंदी उठल्याने, दर वाढ झाली असून गरव्या कांद्याला प्रति क्विंटलला ४ हजार शंभर रूपयांपर्यत उच्चांकी दर निघाला असल्याची माहीती बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी दिली.
खंडाळा तालुक्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी गरवा ५१७, तर हळवा कांद्याच्या ८०० अशा एकूण १३१७ पिशव्यांची आवक झाली.सुमारे चार,पाच महिन्याच्या कालावधीनंतर गरवा, हळवा कांद्याचे दर तेजीत निघाले.त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, कांद्यावरील निर्यात बंदी उठावी ही मागणी होती.शासनाच्या प्रयत्नाने निर्यात बंदी उठल्याने बाजारभावात वाढ झाली असल्याचे सांगत,येत्या काळात शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा सभापती राजेंद्र तांबे यांनी बोलताना व्यक्त केली.
बाजार आवारात गरवा ५१७, तर हळवा कांद्याच्या ८०० पिशव्यांची आवक झाली. त्यांना उच्चांकी दर मिळाले, त्यामध्ये प्रति क्विंटल गरव्या कांद्याला ४१०० रुपये,तर हळव्या कांद्याला ३३०० रुपये दर निघाले. दरम्यान हळवा कांदा नं-१ -२०००ते ३००० रू, कांदा नं-२, ११०० ते २०००, कांदा गोल्टी – ७०० ते ११०० रु. तर गरवा कांदा नं – १, ३००० ते ४१०० रु, कांदा नं-२, १८००ते ३००० कांदा गोल्टी -८०० ते १८०० रु असे दर निघाले आहेत.
आगामी काळात शेतकरी बांधवांनी साठवणुक केलेला कांदा वाळऊन, त्याची प्रतवारी करून विक्रीस आणावा असे आवाहन सभापती तांबे, उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी केले आहे.