कोरेगाव : शेतकरी संघटनेचे प्रणेते, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ माजी खासदार शरद जोशी यांची ५ वी पुण्यतिथी शिरंबे येथे साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सभेत केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्याची सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रमुख वक्ते शेतकरी संघटनेचे सहकार आघाडीचे राज्यप्रमुख संजय कोल्हे म्हणाले, नव्या कृषी कायद्यात काही त्रुटी असल्या तरी त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजाराचे दार उघडले आहे. तसेच शेतकऱ्यांना बाजार स्वतंत्र्य दिले आहे. सरकारचे शेतमाल व्यापार नियंत्रण कमी करून, मार्केट यार्ड ही बाजारपेठ न ठेवता एक देश एक बाजारपेठ ही बाजारपेठ कायद्याने शेतकऱ्यांना दिली आहे. तरी करार शेतीला घाबरून न जाता त्याचा लाभ शेतकन्यांनी घ्यावा बाजार समित्या व हमीभाव राहणारच आहे.बाजारात स्पर्धा होऊन तसेच मध्यस्तांची (दलालांची) साखळी कमी होऊन ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दरवाढीचा फटका बसणार नाही.
शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख बाळासाहेब चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना या कायद्यात चांगल्या तरतुदी आहेत, त्या लोकांना माहीती नाहीत. दिल्लीत जमलेल्या शेतकऱ्यांप्रमाणे आपल्याही जिल्ह्यात अवस्था तशीच आहे. म्हणून गावो गावी जाऊन कायद्याचे फायदे शेतकऱ्यांना समजूनसांगणार आहोत. आम्ही शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली गेली २० वर्ष या कायद्याची मागणीकरत होतो. जर परदेशी थेट गुंतवणूकीने शेतकरी ग्राहक यांना लाभ होणार आहे तर हा विरोध चुकीचा आहे.
या सभेवेळी संघटनेच्या पद नियुक्त्या करण्यात आल्या. महिला आघाडी जिल्हाअध्यक्षपदी संगिता शिंदे, कोरेगाव तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, महाबळेश्वर तालुका अध्यक्षपदी आकाश ठेंबे, खटाव तालुका अध्यक्षपदी सुनिल पांडेकर, वाई तालुका अध्यक्षपदी अजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.