सातारा / प्रतिनिधी
शहरात भटक्या कुत्रांचा नुसता उच्छाद सुरू आहे. कोरोना काळात तर त्यांना खायला नसल्याने त्यांनी नको नको केले आहे. अशा वातावरणात भटक्या कुत्र्यांना रोखण्यासाठी पालिकेकडून कोणतीच उपाय योजना होत नाही. पाठीमागे एक संस्था काम करत होती. तिचे बिल अडकले होते. ते बिल नुकतेच काढण्यात आल्याने पुन्हा शहरातील भटक्या कुत्र्यांचे निरबीजिकरण मोहीम सातारा पालिका राबवणार आहे.
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबिनमध्ये झालेल्या बैठकीला उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगरसेवक धनंजय जांभळे, आरोग्य सभापतीचें पती अशोक घोरपडे, आरोग्य निरीक्षक सुहास पवार यांच्यासह त्या संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. मागचे कामचे बिल निघाल्याने त्या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचे कौतुक केले. दरम्यान, शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्रासही वाढला आहे. पुन्हा निरबीजिकरण मोहीम राबवण्यासाठी याच संस्थेने पुन्हा काम करावे अशी विनंती करण्यात आली. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ही लवकर मोहीम राबविण्यात यावी, आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे पुन्हा शहरातल्या भटक्या कुत्र्यांची निरबीजिकरण मोहीम पालिका राबवणार आहे. नगरसेवक धनंजय जांभळे यांनी तसे पत्र दिले होते. पाठपुरावा केला होता.
Previous Article… प्रकाशकांची भूमिका मोलाची : महापौर
Next Article रत्नागिरी शहर आय टी आय परिसरात बिबट्याचा वावर
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.