सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील गड नववर्षाच्या स्वागताला व गत वर्षाच्या शेवटच्या दिवशी सातारा पोलीस दलाच्यावतीने चांगला पहारा ठेवण्यात आला होता. शिवभक्तांनी केलेल्या मागणीनुसार बंदोबस्त ठेवल्याबद्दल राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे, मंगेश जाधव यांनी शिवभक्तांच्यावतीने पुस्तक देऊन आभार मानले.
यावेळी मंत्री देसाई यांनी आम्ही कायदाच केला आहे. आमच्या पोलीस दलाने डोळ्यात तेल घालून काम केले आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांवर चुकीचे प्रकार घडणे बंद झाले आहे, असे त्यांनी सांगितले.