ऊसतोड बांधवांची दिवाळी झाली गोड
प्रतिनिधी / नागठाणे
संसाराचा गाडा हाकता हाकता एैन सणासुदिच्या काळात आपला मुलुख सोडुन इतरांच्या दिवाळीसाठी गोडवा देणाऱ्या ऊसतोड बांधवांची दिवाळी नुकतीच गोड झाली.संत तुकाराम महाराज वारकरी संस्थेच्यावतीने सातारा तालुक्यातील सोनगाव,शेळकेवाडी परिसरात उसतोडीसाठी वास्तव्यास असलेल्या २५ कुटुंबियांना दिवाळीचा फराळ वाटप व भगिनिंना भाऊबिजेचे औचित्य साधुन साडी वाटप करण्यात आले.
सालाबादप्रमाणे संत तुकाराम महाराज वारकरी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत आपल निःस्वार्थी कार्य परंपरा कायम ठेवल्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व अनेक मान्यवरांकडुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या वेळेस संस्थेचे अध्यक्ष संभाजी शेळके , उपाध्यक्ष व पत्रकार विकास काटकर, संस्थापक अध्यक्ष रामदास कदम , सचिव प्रकाश कुलकर्णी, खजिनदार नंदकुमार माने , संचालक धर्मा गंबरे, धनाजी शेंडगे ,गंगाराम धनवडे, साहेबराव जाधव ,सतिशआप्पा गुजर ,रवि महाराज लोहार , विष्णु पाटील, मीनल लांजेकर , पांडुरंग गोरे , गणेश गुजर , माने टेलर, गुलाबराव सकटे ,सोनगावचे सरपंच पांडुरंग नावडकर,शेळकेवाडी सरपंच संतोष शेळके, अजिंक्यतारा ऊस विकास आधिकारी सचिन जाधव , बेबीताई शळके ( अंगणवाडी सेविका) तसेच ऊसतोड कामगार व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचा आढावा अध्यक्ष ह.भ.प.संभाजी शेळके यांनी घेतला तर आभार ह.भ.प. रामदास कदम यांनी मानले.
सामाजिक हित जोपासण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील व अग्रेसर राहील येत्या काळातही अशीच वाटचाल कायम राखण्याचा संस्थेचा मानस राहील.
ह.भ.प. संभाजी शेळके, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज वारकरी संस्था , जिल्हा सातारा