देशमुखनगर / वार्ताहर :
भूसंपादन कार्यालय तसेच महसूल विभागाकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी सातारा यांना दिनांक 22 रोजी निवेदन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी 25 रोजी त्यांच्या कार्यालयांमध्ये समन्वय बैठक घडवून आणून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता यशस्वी मध्यस्थी केली व भूसंपादन विभागाकडून तहसीलदार सातारा यांच्या दालनात या विषयासंदर्भात दिनांक 4 रोजी बैठक लावण्याचे लेखी आश्वासन दिले.
यामुळे स्वाभिमानी संघटनेने राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन स्थगित केली आहे, अशी माहिती स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली.