प्रतिनिधी / सातारा
भुईंज येथील किसनवीर साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ३५ कोटी रु. थकीत ठेवले आहेत. शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले ऊसबिल वसुली आंदोलनाला आज १० दिवस पुर्ण झाले आहेत.
गेल्या १० दिवसात कारखान्याचे अध्यक्ष यांचे सातारा येथील घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. परंतु कारखानदार, प्रशासन, शासन कोणीही दखल घेतली नाही. या मनोवृत्तीचा जाहीर निषेध म्हणून आज दहाव्याचा कार्यक्रम चेअरमन यांच्या निवासस्थानी करण्यात आला.