प्रतिनिधी / सातारा :
ज्यांना स्वतःचे घर नव्हते. ती मंडळी शासकीय जागेत कुडामेडाच्या छप्परात अतिक्रमण करुन रहात होती. आपले हक्काचे घर होईल की नाही हे त्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. मात्र, शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून फलटण तालुक्यातील हणंमतवाडीत प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील ज्यांना जागाच नव्हती, अशा 24 जणांसाठी घरकुल साकारले आहे. तात्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याची मुहूर्तमेढ रोवली होती. तेव्हापासून विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या कार्यकाळात ते पूर्ण झाले.
प्रत्येकालाच असावे वाटते हक्काचे घर. घर बांधण्याकरिता पैसा आणि स्वतःची जागा असावी लागते. परंतु, स्वतःची जागा नसणाऱ्यांना घर कसे मिळणार. शासकीय जागेत कुडामेडाच्या शेडात रहाणाऱ्यांसाठी पंतप्रधान आवास योजना आली. त्याच योजनेतून ज्यांना घरे नाहीत. त्यांच्यासाठी घरे देण्यासाठी तात्कालिन मुख्य कार्यकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रस्ताव मागवून घेतले. कागदपत्रांची मागणी करुन शासकीय जागा फलटण तालुक्यातील हणुमानवाडी येथे गट नंबर 366 मध्ये 1 हेक्टर 86 आर या जागेत घरकुले उभी करण्याच्या कामास प्रारंभ झाला तो दि. 10 जून 2019 ला. रोजगार हमी योजनेतून लाभार्थ्यांनी ही घरे बांधून घेतले.
प्रत्येकास पाचशे चौरस फुट जागा खरेदी करुन देण्यात आली. त्यामध्ये 275 चौरस फुटामध्ये शौचालयासह घर बांधून देण्यात आले. त्याकरिता या कामासाठी नरेगा अंतर्गत अकुशल 18 हजार 270 रुपये व प्रधानमंत्री रमाई आवास योजनेतंर्गत 1 लाख 20 हजार रुपये व वैयक्तिक शौचालयासाठी 12 हजार असे एकूण 36 लाख 6 हजार 480 इतका निधी खर्च करण्यात आला.