कवी इंद्रजीत भालेरावांनी शब्दांतून स्तुतीसुमने, 21 व्या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन
प्रतिनिधी/ सातारा
ग्रंथ महोत्सव महाराष्ट्राला माहिती नव्हता. पूर्वी ग्रंथ महोत्सव होत नसतं. जत्रा-यात्रा होत असतं. ग्रंथ वाचनही होत असतं. ग्रंथ पूजन होत असतं. जगभरात वर्ल्ड बुक फेअर होत असते. दिल्लीत पुस्तक मेळा होतो. बांगलादेशातही पुस्तकांचा मेळा होतो. साताऱयात ग्रंथ महोत्सव सुरु करण्याची संकल्पना दिनकर पाटील यांनी सुरु केली. त्यांची बदली झाली. तेथेही त्यांनी ग्रंथ महोत्सव सुरु केले, परंतु सातारकरांनी ग्रंथ महोत्सव 21 वर्ष फुलवत ठेवला. बहरत ठेवला. वाढवत ठेवला. त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले, म्हणून साताऱयाचा ग्रंथ महोत्सव आगळावेगळा ग्रंथ महोत्सव आहे, असे मत कवी इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केले.
21 व्या ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण उपसंचालक दिनकर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, रमेश चव्हाण, सुनीताराजे पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भालेराव म्हणाले, मी साताऱयाचा आहे. माझं सातारा गाव आहे. राजेंद्र माने यांनी कधी बोलवलं, त्यांनी लिहिलेली छान छान पत्रे आहेत. पाटणे सरांच्यामुळे आर. आर. आबा माझ्या आयुष्यात आले. राजकारणाबाहेरचे आबा मला कळले. कुटुंबवस्तल आबा पाहिले. माझ्या आईच्या खाटेवर बसून भाकरी कसे खायचे ते आठवते. ते माझ्या वाटय़ाला आले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उभं राहण्याची संधी मला साताऱयाने दिली. शंकर सारडा यांनी दिली. या व्यासपीठाने दिली. त्यावेळी अभयसिंहराजे भोसले होते. हे मी वेळोवेळी लिहिले आहे. ग्रंथमहोत्सव आपल्या महाराष्ट्राला माहिती नव्हता. ग्रंथ महोत्सवाची माहिती नव्हती. ग्रंथ महोत्सव होत नसत. जत्रा-यात्रा होत असतं. ग्रंथ वाचन होत असतं. ग्रंथ पूजन होत असतं. बाहेर जगभरात वर्ल्ड बुक फेअर होतात. पुस्तक मेला होतो. ग्रंथ महोत्सव सुरु करण्याची संकल्पना दिनकर पाटलांनी सुरु केली. एक वर्ष नाही 21 वर्ष हा महोत्सव भरतो आहे. साताकर भूमिकेच्या पाटीमागे आहेत. आगळावेगळा ग्रंथ महोत्सव आहे. असे दुसरीकडे ग्रंथ महोत्सव होत नाहीत. शासकीय पातळीवर शासकीय ग्रंथ महोत्सव होतात, असे त्यांनी सांगितले.
दिनकर पाटील म्हणाले, भारत हा देश 2020 साली सगळ्यात तरुण देश आहे. देशाचे सध्याचे सरासरी वय 29 असे आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणायचे त्याप्रमाणेच देश तरुण होत आहे. आज आपल्या समोर बसलेली पिढी आहे. ती माहिती तंत्रज्ञानाच्या जवळ गेली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आहेत, त्यामुळे सगळं जग मुठीमध्ये आले आहे. माहितीचे ज्ञानात कस रूपांतर होणार?, ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून ते फुलत आहे. भविष्यात ज्यांच्याकडे ज्ञान असेल तोच श्रीमंत असेल. पुस्तकाच्या रुपात आत्मसात केलं तर ज्ञान. शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळाला; पण आमच्या शाळा कधी सेव्हन स्टार होणार, विद्यार्थी कधी स्टार होणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजेश क्षीरसागर म्हणाले, या ग्रंथ महोत्सवात चार दिवस साहित्यिकांची मेजवानी असते. पाचव्या दिवशीही यावर्षी आहे ती फक्त शिक्षकांसाठी असेल. अरुणा ढेरे साताऱयात दि. 7 रोजी येत आहे. मराठी शिक्षकांसाठी सैनिक स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 वा ग्रंथ महोत्सव महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असा आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक शिरीष चिटणीस यांनी केले. सुनीता कदम सूत्रसंचालन केले. स्वागत राजेश क्षीरसागर यांनी केले. यावेळी साहेबराव होळ, नंदा जाधव, संध्या चौगुले, कुमुदिनी मंडपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरोजिनी बाबर यांच्या आत्मचरित्राचे आणि मी कसा घडलो या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
कवी इंद्रजीत भालेराव यांच्या कवितांनी उपस्थितांच्या डोळय़ात अश्रू
शेतकऱयांच्या व्यथा मांडणारा कवी म्हणून इंद्रजीत भालेराव यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी शेतामध्ये खोप… त्याला बोराटीची झाप.. तिथ राबतो माझा बाप.., शिक बगा शिक… लढायला शिक.. घेतलेली कर्ज बुडवायला शिक, कुणब्याचा पोरा पाडायला शिक.., अशा कविता त्यांनी सादर केल्या. त्याला विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी टाळय़ांची दाद दिली. तर त्यांनी त्यांच्या आईवरील कविता वाचन केल्यानंतर डोळय़ातून उपस्थितांच्या अश्रू आले.: