प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा प्रार्दूभाव कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने वेगवेगळे नियम काढत आहे. त्यातच दुकाने कधी संपूर्ण बंद तर कधी वेळेची मर्यादा देवून सुरु ठेवण्याचे नियम लावत आहे. आताही दुपारी चार वाजेपर्यंतची वेळ आहे. ही वेळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात यावी, जेणेकरुन ग्राहकांचीही सोय होईल, अशी साताऱयातील व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांची मागणी आहे.
कोरोनामुळे अनेक नियम प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांनी घेतले आहेत. अनेकवेळा नियम बदलले गेले आहेत. हे नियम काहीवेळा कडक स्वरुपात केले गेले. त्यावेळी जेवढा कमी वेळ तेवढी लोकांची गर्दी जास्त राहते हे चित्र पहायला मिळाले आहे. जेवढी वेळ जास्त तेवढी गर्दी कमी हे सूत्र व्यवहाराचे आहे. त्यामुळे नागरिकांची आणि व्यापाऱयांची गैरसोय टाळण्याकरता प्रशासनाने दुकानांसाठीची वेळ ही दुपारी चारपर्यंत ऐवजी सायंकाळी सातपर्यंत करण्यात यावी. जेणेकरुन सर्वांचीच सोय होईल. गर्दीही होणार नाही. सोशल डिस्टन्स राखून सर्व व्यवहार करता येतील, अशी मागणी होवू लागली आहे.
वेळ वाढवली तर सर्वसामान्यांची सोय होईल
रोजच्या रोज खरेदी करणारा वर्ग मोठय़ा प्रमाणावर असतो. तो वर्ग दररोज काम करतो तेव्हा त्यांना सायंकाळी 5 वाजता काम संपल्यानंतर त्यांच्या हातात पैसे येतात तेव्हा ते खरेदी करत असतात. मात्र, दुपारी चार वाजता दुकाने बंद झाल्यावर त्यांना खरेदी करता येत नाही. पगारदार मंडळी दररोज खरेदी करणाऱयामध्ये केवळ 25 टक्के एवढे प्रमाण आहे. वेळ वाढवली तर गर्दी होणार नाही. सामान्यांची सोय होईल.
खंडूशेठ सारडा, व्यापारी
नोकरदार मंडळीची वेळ वाढवल्याने सोय होईल
जिह्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. अशा वेळेला चार ऐवजी सातपर्यंत दुकानांची वेळ वाढवली पाहिजे. थोडय़ा वेळेत गर्दी होते. पण वेळ जास्त असेल तर गर्दी होणार नाही. ऑफिसमधील सरकारी नोकरीनिमित्ताने कामावर असलेल्यांना कार्यालयीन वेळ सुटल्यानंतर दुकाने उघडी असली तर खरेदी करता येते. त्यामुळे सायंकाळी 7 पर्यंत दुकाने उघडी ठेवावीत.
गोपाळ शेठ, व्यापारी