मारहाण करुन 3 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लांबवला
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील खावली येथे बारामतीला कसे जायचे असे विचारत अनोळखी तीन जणांनी व्यापाऱयास हाताने तसेच बुक्यांनी मारहाण करत दि. 26 रोजी रात्री 10 वाजता लुटल्याची घटना घडली. चोरटय़ांनी 3 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला असुन या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन चोरटय़ांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम हे तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रशांत नंदकुमार जगदाळे (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या कारमधून दि. 26 राजी सायंकाळी कोरेगाव बाजूकडे निघाले होते. त्यांनी रात्री दहा वाजता गाडी खावलीनजिक थांबवली अन् लघुशंकेला उत्तरले. त्याच दरम्यान पल्सर दुचाकीवरुन तीन जण आले. त्यांनी बारामतीला कसे जायचे असे विचारुन बोलण्यात गुंतवत ठेवत अचानक मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे अचानक झालेल्या हल्याने ते भयभित झाले. दगडाने आणि बुक्यांनी मारहाण करुन त्यांच्या गळय़ातील 45 हजार रुपयांची सोन्याची तीन तोळय़ाची साखळी, 1 हजार रुपयांचे मनगटी घडय़ाळ, 1400 रुपयांचे लेदरचे पॉकेट, त्यामध्ये 1400 रुपये रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, 5 हजार रुपयांचा मोबाईल, असे एकूण 3 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला असून या प्रकरणाची घटना समजताच सह पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल यांनी या अनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम हे तपास करत आहेत.