प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर शनिवारी लस घेण्यासाठी नागरिक गेले पण लस नसल्याने नागरिकाना परत रिकाम्या हाताने यावे लागले. जिह्यातील सर्वच लसीकरण केंद्राबाहेर तोबा गर्दी दिसत होती. दोन दिवसांपूर्वी लस आली होती त्यामध्ये शुक्रवारी एका दिवसात 20414 जणांना लस देण्यात आली होती. मात्र, पुण्याकडून लसीचा पुरवठा न झाल्याने शनिवारी लसीचा पुरवठा केंद्रांना झाला नाही. जिल्हय़ातील सर्वच लसीकरण केंदाबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. पण लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना आल्या पावलाने मागे फिरायला लागले. लसीअभावी जिल्हय़ात दुसऱयांदा लसीकरण मोहिमेला बेक लागला आहे. परंतु लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण होणार असल्याचे फलक लावण्यात आलेले आहेत.
सातारा जिह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने लसीकरण मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. पुण्यातुन साताऱयात लस मिळताच लगेच सातारा जिल्हा आरोग्य यंत्रणा ही ती लस सर्क्युलेट करते. अन् लसीकरण केंद्रावर लस टोचली जात आहे. नागरिकांना लसीचे महत्व पटत असल्याने आधारकार्ड घेऊन 45 वर्षावरील नागरिक लसीकरण केंद्राबाहेर दररोज लस घेण्यासाठी जमतात. मात्र, लस काही तासात संपते. लसीकरण केंद्राचा बोर्ड लावला जातो अन् आलेल्या जेष्ठ नागरिकांना परत लस न मिळाल्याने जावे लागते. दुसऱया दिवशी सकाळी लवकर उठून लसीकरण केंद्राबाहेर जेष्ठ नागरिक जमतात. शहर व परिसरातील नागरिक गर्दी करतात. मात्र तोच प्रकार घडतो. शनिवारी सकाळीच लसीकरण केंद्र सुरू झाले नव्हते. सकाळपासून नागरिक प्रतीक्षा करत रांग लावून केंद्र कधी उघडेल याचीच प्रतीक्षा करत थांबले होते. शुक्रवारी जिह्यात 20 हजार 414 जणांना लस दिली गेली होती. मात्र, शनिवारी पुरवठा झाला नसल्याने नुसती गर्दी झाली होती. काही केंद्र तर बंद होती तेथे कर्मचारीही नव्हते.