शहरात येवू नका रस्ते बंद : पोलिसांचा कडक बंदोबस्त : अत्यावश्यक गोष्टी अपवाद
प्रतिनिधी / सातारा
पाहता पाहता साताऱयात कोरोना अनुमानितांची संख्या शतकाकडे गेली असून आता जिल्हय़ात तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने जनतेमध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळायचा असेल तर 100 टक्के लॉकडाऊन केल्याशिवाय गत्यंतर नसल्याने पोलीस प्रशासनाने साताऱयातील सर्व रस्त्यावर बॅरिकेटस लावून नाकाबंदी केली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद असून शहरात आला तर कोठून कसे जावे तेच कळणार नाही. त्यापेक्षा घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. पोलिसांनी आता भर उन्हातान्हात आणि रात्रभर कडक बंदोबस्तही तैनात केला आहे.
प्रारंभी अनुमानिताची संख्या कमी होती त्यात वाढ झाली असून त्यापैकी बऱयाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले ही दिलासादायक असले तरी त्यापैकी तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत ही जिल्हय़ासाठी धोक्याची घंटी आहे. त्यामुळेच विषाची परीक्षा पाहण्यापेक्षा संपर्क तोडून कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याचे आव्हान सातारकरांसमोर आहे. 90 टक्के सातारकर लॉकडाऊन चांगल्या पध्दतीने पाळत आहेत. मात्र 10 टक्के सातारकरांना अद्याप अक्कल येत नाही. त्यासाठीच आता पोलिसांनी सातारा शहरात सर्वत्र नाकेबंदी केली आहे.
राजवाडा, मंगळवार तळय़ाकडून येणारा रस्ता, राधिका चौकातून कोटेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता, पोवईनाक्यावर मुख्यालयाकडे जाणारा रस्ता, बसस्थानक परिसरातील सेव्हन स्टार समोरील चौक, तहसीलदार कार्यालयासमोर सेवा रस्ते यासह जिल्हा परिषद, विसावा नाका, बाँबे रेस्टारंट चौक, अंजठा चौक सर्वत्र रस्ते बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडणे हिताचे ठरेल, बाहेर पडलाच तर बंद रस्त्यातून इच्छित ठिकाण शोधताना फक्त घिरटय़ा घालून घरी परतावे लागेल.
अत्यावश्यक सेवा सुरु आहेत
नाकाबंदी केली तर अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या असून ज्यांना परवानगी आहे त्यांच्यासाठी पोलीस खात्याकडून सहकार्य केले जात आहे. अत्यावश्यक आजारी रुग्णांच्या रुग्णवाहिका सोडल्या जात आहेत तर जे शासकीय कर्मचारी राष्ट्रीय आपतीत काम करत आहेत त्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना त्यांना सोडले जात आहे. पेट्रोलपंपावर जिल्हाधिकाऱयांनी सूचना केलेल्या अत्यावश्यक सेवांशी संबंधितांना नावे नोंदवून व ओळखपत्रे, परवानगी पाहूनच डिझेल व पेट्रोल दिले जात असल्याने पुढील काळात कडक लॉकडाऊन करुन कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी सातारकरांनी प्रशासनाला सहकार्य केलेच पाहिजे.
साताऱयात मॉर्निंग वॉकवाल्यांवर कारवाई
साताऱयात अद्यापही लॉकडाऊनचा नीटसा अर्थ न कळलेले सुशिक्षित आहेत. त्यांना कोरोनाचे गांभीर्य देखील कळत नाही. कारण त्यांचे शिक्षण होवूनदेखील ते अडाण्याचे सोंग घेत आहेत. शेवटी पोलिसांना मॉर्निंग वॉकसाठी अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलेल्या अशा सातारकरांवर कारवाई करण्याची वेळ आली. या सर्वांना सातारा शहर पोलीस ठाण्यात नेवून तिथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी त्यांचे प्रबोधनही केले. कोणीही नागरिकांनी रस्त्यावर येवू नये व लॉकडाऊन यशस्वी करुन कोरोनाविरुध्द सुरु असलेला आपला सगळय़ांचा लढा जिंकावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.