प्रतिनिधी/. सातारा
रामविलास पासवान यांच्या जाण्याने पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे.तरीही पक्षाचे अध्यक्ष खा. चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी काम सुरूच ठेवणार आहे, असे मत लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांनी व्यक्त केले.
लोक जनशक्ती पार्टी व दलित सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित शोक सभेत ते बोलत होते. यावेळी गणेश दुबळे, कांतीलाल कांबळे, उमेश खंडूझोडे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, निलेश भोसले, संजय शेडगे, सुरेश जाधव, अमोल बोबडे, सिताराम भवाळ, करण गायकवाड, रणजित कसबे, धुमाळे, भोसले, पूजा बनसोडे, निता ठाकूर, यशवंत मतकर, रवी भोसले, हेमंत भोईटे, जावेद मुलाणी, विशाल गायकवाड व विविध संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.