शहरासह जिल्हय़ात ढगाळ वातावरण, अनेक ठिकाणी पावसाच्या सरी
प्रतिनिधी/ सातारा
सध्या हिवाळा असलातरी गेले काही दिवस दिवसभर उन्हाच्या झळा जाणवत होत्या. पण रविवारपासून वातावरणात बदल झाला आणि ढगाळ वातावरण झाले होते. सोमवारी तर संपुर्ण दिवस ढगाळ वातावरण होते. तसेच वातारणात गारवा निर्माण झाला होता. सोमवारी शहर परिसरासह जिल्हय़ाच्या अनेक भागात पाऊस पडू लागल्यामुळे ‘हिवसाळा..!’ असा चौथा ऋतु सुरू झाला की काय असा भास दिवसभर होत होता. रात्री उशिरापर्यंत असेच वातावरण झाले होते.
कोरोनाचा आलेख खालावत असताना वातावरणातील बदल नागरिकांना मानवणारा नसल्यामुळे अनेकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळलेच होते. घराबाहेर पडावेच लागले तर अंगात स्वेटर, जर्किन घालून तसेच हातात छत्री घेतल्याशिवाय कोणीही रस्त्यावर दिसत नव्हता. दिवसभर जाणवणाऱया बोचऱया थंडीमुळे नागरिकांना कोरोना वाढेल काय अशी भीती जाणवू लागली होती.
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे विपेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. वातावरण खराब असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी तुरळक जाणवत होती. त्याचबरोबर किरकोळ भाजी विक्रेत्यांनी विशेषता ग्रामीण भागातुन येणाऱया विक्रेत्यांना सोमवारी झालेल्या वातारणामुळे भाजी-पाला विक्रीला दांडी मारली असल्याचे चित्र दिसत होते.
हे हवामान नागरिकांच्या दृष्टीने घातकच आहे. कारण सध्या कोव्हीड सारख्या विषाणूने संपुर्ण जगात हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नागरिक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिकच जागरूक झाले आहेत. त्याततच आता अचानक होणाऱया हवामानाच्या बदलाचा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तापदायकच ठरत आहे. वातारणात होणाऱया हा बदलामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी सारख्या आजारांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे हवामानात झालेल्या या बदलाचा बऱयाच नागरिकांनी धास्तीच घेतली होती.
पिकांवर परिणाम
या हवामानाच्या बदलाचा परिणाम हा पिकांवर देखिल मोठय़ा प्रमाणात होतो. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनच्या संकटामुळे कित्त्येक शेतकऱयांची पिके ही शेतातच कुजुन गेली. तसेच काही पिकांना तर योग्य हमीभाव देखील मिळाला नाही. त्यातच आता वातारणात होणाऱया या बदलामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.