प्रतिनिधी/ सातारा
कालपासून जिह्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. सातारा शहरात दिवसांचा पारा 24 अशांवर आलेला आहे. रविवारी दिवसभर हुडहुडी भरल्याचे वातावरण सातारा शहरासह जिह्यात होते. सायंकाळी पुन्हा थंडीने जोर धरला होता. त्यामुळे रविवारी बाजारचा दिवस असूनही सातारा शहरातल्या बाजारपेठेत थंडीचा परिणाम जाणवत होता. दरम्यान, महाबळेश्वरात सकाळी हलकासा पाऊस झाला. या वातावरणामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या वातावरणामुळे घरातच राहणे पसंत केले.
दरम्यान, जिह्यातील इतर ठिकाणी निरभ्र वातावरण असले तरीही वाऱयाचा वेग होता. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवू लागला. सकाळपासूनच थंडीचा कडाका कायम होता. मॉर्निंग वॉक करणाऱयांनी तर थंडीची तिव्रता पाहून अंथरुणातून बाहेर पडणेच टाळले. सुट्टीचा दिवस असल्याने घरातून बाहेर सहसा कोणी पडत नव्हते. त्याचाच परिणाम शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. बाजाराचा दिवस असून महात्मा फुले भाजी मंडई, सदाशिव पेठेत, गुरुरवार परजावरुन जुन्या कपडय़ाच्या बाजारात तसेच रविवार पेठेतील भाजी मंडई व श्री. छ. प्रतापसिंह महाराज थोरले भाजी मंडईत शुकशुकाट जाणवत होता. थंडीची तीव्रता वाढल्याने उबदार कपडय़ाच्या दुकानावर गर्दी दिसत होती. दरम्यान, याच वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहु, हरभरा, शाळु या पिकांवर परिणाम होण्याची भीती शेतकऱयांमधून व्यक्त होत आहे.