सातारा तालुक्यात तब्बल 236 बाधित : 783 जणांची कोरोनावर मात ,856 जणांचा अहवाल बाधित ,जिल्हय़ात 27 बाधितांचा मृत्यू
प्रतिनिधी /सातारा
जिल्हय़ातील बाधित वाढ व मृत्यूसत्र थांबत नसल्याने जगरहाटी सुरु झाली असली तरी नागरिक पॅनिक आहेत. मुंबईत 190 नवीन रुग्ण तर एकटय़ा सातारा तालुक्यात 236 नवीन बाधित रुग्ण ही तफावत पाहता सातारा शहर तालुक्यासह जिल्हय़ातील संसर्ग स्थिती थांबणार तरी कधी हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळून आल्याचा दिलासा असला तरी साताऱयासह कराड, फलटण, माण, खटाव तालुक्यात तीन अंकी संख्येने होणारी वाढ चिंतेत भर टाकत आहे. सातारा शहर व तालुक्यावरील हॉटस्पॉटचा शिक्का कायम असून आतापर्यंत सातारा एकूण बाधित संख्येत 50 हजारांकडे जावू लागला आहे.
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 856 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यू झाला. तर मंगळवारी सायंकाळी 783 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्तीकडे
जिल्हय़ात बाधित वाढीने कहर सुरुच ठेवला असून सोमवारच्या अहवालात मात्र महाबळेश्वर तालुक्यात एकही नवा रुग्ण समोर आला नसल्याचा दिलासा लाभला आहे. तर खंडाळा, कोरेगाव, वाई, पाटण व जावली दोन अंकी संख्येवर रेंगाळत असून तीन संख्येच्या रांगेत सातारा व कराडबरोबरच आता फलटण, खटाव, माण दाखल झाल्याने त्या तालुक्यांमध्ये चिंता वाढलीय. यामध्ये सातारा तालुक्यात तब्बल 236 म्हणजे मुंबईत येणाऱया नवीन रुग्णसंख्ये एवढे रुग्ण एकटय़ा सातारा तालुक्यात समोर आलेत.
बळींचे सत्र थांबणार कधी ?
बाधित वाढ आणि बळी या दृष्टचक्रात सातारा जिल्हा सापडलाय. सगळय़ा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. बेडसाठी धावाधाव नाही. मात्र, तरी देखील बाधितांचे मृत्यू होत असल्याने नागरिक अवाक झालेत. तसेच मृत्यूची संख्या देताना आकडेवारी अपलोड घोटाळा सुरुच आहे. त्या त्या दिवशी आकडे अपलोड होत नसल्याचे समोर येवूनही कोणावरही कारवाई झालेली नाही. दुसरी लाट संपेना अन तिसऱया लाटेत काळजी घेण्याचे भविष्य पालकमंत्र्यांसह प्रशासन सांगत आहे.
कोटय़वधी रुपये खर्च पण दिलासा नाही
जिल्हय़ाला कोरोना संसर्गातून सावरण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांवर उपचार, लसीकरणासाठी कोटय़वधी रुपये निधी शासनाकडून मिळला आहे. मिळतोय देखील. मात्र, निम्म्याहून अधिक लोकसंख्येचे लसीकरण झाले. कोरोना हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. पण ना बाधित वाढ थांबली ना मृत्यूसत्र थांबले, अशी जिल्हय़ाची स्थिती आहे.
लसीचे दोन डोस घेतले तरच मॉलमध्ये प्रवेश
जिल्हय़ातील सर्व शॉपिंग मॉल्सला रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्या आदेशात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बदल केला असून नवीन आदेशानुसार मॉलमधील व्यवस्थापन व कर्मचाऱयांसह आत प्रवेश करणाऱया नागरिकांनी लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असून दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाल्यानंतरच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
856 जणांचा अहवाल बाधित
सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. सातारा 236 (47,675), फलटण 150 (33,139), खटाव 104 (23,240), कराड 102 (36,955), माण 102 (16,029), खंडाळा 41 (13,584), कोरेगाव 54 (20,131), वाई 23 (14,991), पाटण 21 (9821), जावली 18 (9,665), महाबळेश्वर 0 (4,552) व इतर 5 (1,755) असे आजअखेर एकूण 2,31,537 नागरिकांचे अहवाल बाधित आहेत.
जिल्हय़ात 27 जणांचा मृत्यू
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (207), कराड 6 (1,111), खंडाळा 1 (176), खटाव 4 (565), कोरेगांव 1 (435), माण 1 (320), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (351), फलटण 10 (574), सातारा 3 (1,386), वाई 0 (342) व इतर 0 (75), असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 5,630 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुक्ती 2 लाख 18 हजार पार
जिल्हय़ात आजपर्यंत एकूण 16 लाखांच्या वर कोरोना टेस्टिंग झाले असून त्यापैकी 2 लाख 31 हजार 537 जणांचा अहवाल बाधित आला. पैकी 5 हजार 360 जणांचा मृत्यू झाला असून 2 लाख 18 हजार 361 जणांनी कोरोनावर मात करत या लढय़ाला बळ दिले आहे. कोरोनामुक्तीचा आलेख देखील सातत्याने कमी जास्त होत असून बाधित वाढ मात्र तीन अंकी संख्येने सुरुच आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
- एकूण नमूने 16,02,006
- एकूण बाधित 2,31,537
- एकूण कोरोनामुक्त 2,18,361
- मृत्यू 5,630
- उपचारार्थ रुग्ण 10,226
मंगळवारी जिल्हय़ात
- बाधित 859
- मुक्त 783
- बळी 27