शाहूपुरी / वार्ताहर :
कास धरण उद्भव योजनेतून पाणी पुरवठा होणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनला कासाणी गावाजवळ मुख्य लाईनवर दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. गळती काढण्याचे काम पूर्ण होण्यास साधारण आठ तासांचा कालावधी लागणार असलेने बुधवार दि. 6 रोजी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा व गुरुवार दि. 07 रोजी नियमित होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने अथवा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.
त्यामुळे कास धरण उद्भव योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले.