स्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो. मानवाला काम करण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा किंवा कॅलरीज अन्नातून मिळतात म्हणून अन्नाची किंवा आहाराची आवश्यकता असते.
सात्विक आहार हे सत्त्वगुण किंवा सात्विक, सत्व प्रकृतीचे गुण आहेत. शुद्धता हा मुख्य गुणधर्म असणाऱया वस्तुंना सात्विक संबोधले जाते. एखादी वस्तू किंवा व्यक्ती सात्विक असण्यासाठी कोणताही रोग, वाईट, उपद्रवी शक्ती किंवा दूषितपणा फोफावणार नाही हे आवश्यक असते. तसेच ती कोणत्याही इतर मुलद्रव्यांपासून दूषित असता कामा नये.
दैनंदिन जीवनात दुपारच्या जेवणात फुलके, भाकरी आणि वेगवेगळय़ा प्रकारच्या भाज्यांचा समावेश असावा. सोबत कोशिंबीर, डाळ, उसळी, चिकन, मासे, दही, ताक असे जेवण असावे. पण घरी किंवा ऑफीसमध्ये जाताना प्रत्येक वेळेस असा डबा नेणे शक्मय नाही. मधल्या वेळेत चणे, बदाम, आक्रोड खावेत. कुरमुरे, ज्वारीच्या लाह्या सोबत न्याव्यात. चिक्की, राजगिरा, कुरमुरा लाडू खावा. यामुळे गोड खायची तल्लफ कमी होते व अरबट चरबट खाण्याची गरज भासत नाही.
दररोज दूध प्यावे. आहारात ताक व दही यांचा समावेश असावा. साधा पॉलिश भात खाण्यापेक्षा हातसडीचा लाल भात खावा. रिफाइन्ड तेलाचा वापर कमी करून ऑलिव्ह ऑईल वापरावे. बाजारातील अतिमहाग सॉस, चटण्यांपेक्षा ते घरच्या घरी बनवाव्यात. त्यामुळे मीठाचे प्रमाणही नियंत्रणात राहाते. बाजारातील पॅकेट सूप पिण्यापेक्षा सूप व सलादच्या सोप्या पाककृती शोधून त्या कराव्यात.
मैदा, डालडा, साखर व मीठ हे आपले चार पांढरे शत्रू मानावेत. मैदा हा पचायला जड असतो. त्याऐवजी गहू, ज्वारी, बाजारी, नाचणी, सोयाबीनचा वापर करावा. डालडा कधीही वापरू नये. पण गाईचे तूप एक चमचा औषध म्हणून घेण्यास हरकत नाही. त्यामुळे जीवनसत्व अ, ड, ई, क याचे पचन होते. दूध, पनीर, दही, शाक नेहमी आहारात घ्यावे. त्याने प्रथिने व कॅल्शि?यमचे प्रमाण वाढते.
महिलांनी नाचणी व सोयाबीन हे रजोनिवृत्तीनंतर अवश्य घ्यावे. प्रथिनांचे प्रमाण कमी असल्यास आपल्याला ब जीवनसत्त्वाची कमतरता जाणवते. सध्या मांसाहार, दूध, पनीर, अंडी वर्ज्य असलेला आहार घेणारे अनेकजण आहेत. शाकाहारी मंडळींना अनेकदा शरीरात बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता जाणवते. त्यामुळे खूप थकवा येणे, स्नायू दुखणे, केस गळणे इत्यादींचा त्रास होतो. त्यामुळे शरीरात प्रथिनांचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी डाळी, उसळी, राजमा, छोले, हरभरे यांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे.
ज्या वस्तुंमुळे किंवा व्यक्तींमुळे त्यांच्या आस्तित्त्वाने आजुबाजूचे वातावरण शुद्ध होते अशा वस्तू किंवा व्यक्ती सात्विक होय. जेव्हा एखादी व्यक्ती सात्विक अन्न ग्रहण करते (खाते) त्यावेळी तिला शुद्धतेचा अनुभव मिळून मनाचे समाधान मिळते.