शेतकऱयांतून तीव्र नाराजी : तातडीने केंद्रे सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी सात-बारा उताऱयांसह इतर कागदपत्रे हजर करण्याचे आवाहन करण्यात आले. ती कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सात-बारा उतारा देण्याचे केंद्र तसेच जुन्या तहसीलदार कार्यालयातील केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱयांना उतारा मिळणे कठीण झाले आहे.
उतारा न मिळाल्यास नुकसानभरपाईपासून शेतकऱयांना वंचित रहावे लागण्याची शक्मयता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सात-बारा उतारा केंद सुरू करण्यात आले. मात्र बऱयाचवेळा हे केंद्र बंदच राहते किंवा सर्व्हर तरी डाऊन असते नाही तर कर्मचारी सुट्टीवर असतात. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे.
जुन्या तहसीलदार कार्यालयातील सात-बारा उतारा मिळण्याचे केंद्रही गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. सध्या शेतकऱयांना नुकसान भरपाईबरोबरच कर्ज मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र ही कागदपत्रे मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून सात-बारा उतारा देण्यासाठी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
बऱयाचवेळा उताऱयासाठी दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. कर्ज घेणे, बोजा कमी करणे, जमिनीची पडताळणी यासाठी वारंवार उताऱयाची गरज असते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या केंद्रातील कारभार सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.