साबण हा भारतीय जनतेच्या जीवनातील आवश्यक घटक बनला आहे. भारतात साबणाचे अत्यंत विकसित असे मार्केट आहे. पूर्वी हे मार्केट फक्त शहरापुरतेच मर्यादित होते. पण आज देशातील प्रत्येक कानाकोपऱयात हा बाजार पसरला आहे. यावर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जरी वर्चस्व असले तरी आयुर्वेदिक, नैसर्गिक किंवा औषधी गुणधर्म असलेल्या साबणात देशी कंपन्या अजूनही ठामपणे पाय रोवून उभ्या आहेत. साबणाचे हे 1700 कोटी रुपयांचे मार्केट दरवर्षी 9 ते 12 टक्क्मयांनी वाढतच आहे.
‘टॉयलेट सोप’ किंवा ‘बेदिंग बार’ असे दोन प्रकारचे साबण आज बाजारात उपलब्ध आहेत. साबणाची प्रत ही प्रामुख्याने त्यातील स्निग्ध पदार्थ आणि न विरघळणारे घटक ऊइश् यावर ठरविली जाते. भारतीय मानक संस्थेच्या नियमांनुसार 76 टक्क्मयांपेक्षा जास्त ऊइश् असणारे साबण प्रथम श्रेणीत, 70 टक्क्मयांपेक्षा जास्त ऊइश् असणारे द्वितीय श्रेणीत तर 60 टक्क्मयांपेक्षा जास्त ऊइश् असणारे साबण तृतीय श्रेणीत मोडतात. यापेक्षा कमी ऊइश् असणारे साबण टॉयलेट सोप या प्रवर्गात न मोडता त्यास बेदिंग बार असे म्हटले जाते. अशा बारवर ऊइश् चे प्रमाण नमूद करणे आवश्यक नसते.
भारतीय मार्केटमध्ये सुवासिक, घामाची दुर्गंधी घालविणारे, त्वचा गोरी करणारे (सौंदर्यवर्धक), लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेणारे, औषधी गुणधर्म असलेले, हर्बल किंवा नैसर्गिक पदार्थ वापरून बनविलेले अनेक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी त्वचेची छिदे मोकळी करावी लागतात, जी घाम किंवा धूळ, जीवाणू यामुळे बंद होतात. यासाठी साबणाचा वापर आवश्यक असतो.
ग्रामीण भागातील किंवा कष्टकरी आणि कामगार वर्गातील लोक शरीर स्वच्छतेसाठी जंतुनाशक साबणाचा वापर करतात. यात प्रामुख्याने ऊrग्म्त्देह नावाचे केमिकल असते. त्यामुळे त्वचेवरील जंतूंचा नायनाट होतो. पण याच्या नियमित वापराने हे जंतू प्रतिकारक बनतात म्हणून यांचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. हे केमिकल विघटनक्षम नसते. म्हणून असे साबण पर्यावरणाला देखील हानिकारक ठरतात.
शरीरातील आदता कायम टिकविण्यासाठी Moisturizing creams वापरून बनविलेल्या साबणाचा जरुर उपयोग करावा. त्वचा तेलकट किंवा कोरडी कोणत्याही प्रकारची असली तरी या प्रकारचा साबण वापरला असता त्वचेचा समतोल राखला जातो.
आजकाल त्वचा गोरी करणारे साबण अत्यंत लोकप्रिय आहेत. अशाप्रकारच्या साबणांमध्ये रंगद्रव्य कमी करणारी केमिकल्स वापरली जातात. यामुळे वर्णद्रव्य तयार होण्याचे प्रमाण कमी होते व त्वचा उजळ बनते. परंतु याच्या अतिवापराने त्वचा काळी पडण्याची भीती असते. रंग उजळण्यासाठी केशर, दही, बेसन, हळद किंवा लिंबू इत्यादी नैसर्गिक पदार्थ वापरून बनविलेले साबण वापरावे. दह्यातील आम्ल किंवा लिंबातील ‘क’ जीवनसत्व मेलॅनिनचे (रंगद्रव्य) प्रमाण कमी करून त्वचा उजळ करतात.
ज्येष्ठ नागरिकांनी साबणाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. कारण यांच्या त्वचेत मुळातच तेल कमी पाझरते. त्यात साबणाच्या सततच्या वापराने त्यांची त्वचा अजून कोरडी पडते. जगात आजकाल ‘बॉडी वॉश’ किंवा ‘फेस वॉश’ वापरण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. बॉडी वॉश हे पेट्रोलियम पदार्थापासून बनविले जातात. हे साबणापेक्षा जास्त मृदू व त्वचेला कमी हानिकारक असतात. महिलांमध्ये सर्वात लोकप्रिय असणारे द्रवरूप स्वरूपात असणारे साबण म्हणजे फेसवॉश. मेकअप उतरवण्यासाठी, मृत त्वचा काढण्यासाठी, तेलकटपणा घालविण्यासाठी, हवेतील प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी फेसवॉश वापरले जातात. चेहऱयाची कातडी नाजूक असल्यामुळे साध्या साबणापेक्षा हे जास्त उपयुक्त ठरतात. मात्र हे सर्व जरी खरे असले तरी ते साध्या साबणापेक्षा तिपटीने महाग असतात. फेसवॉश वापरताना हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याच्या वापरानंतर त्वचा तजेलदार दिसली पाहिजे. ती लाल दिसता कामा नये किंवा चेहऱयाला खाजही येता कामा नये. म्हणूनच नॅचरल पदार्थ वापरून बनविलेले फेसवॉश वापरण्याचा आग्रह धरावा.
भारतीय मानक संस्थेच्या (इकर) नियमांनुसार 95 टक्के पदार्थ जर नैसर्गिक स्वरूपाचे असतील तरच त्याला ‘नैसर्गिक’ असे संबोधता येते. पण दुर्दैवाने या नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याने अनेक निकृष्ट दर्जाची उत्पादने नैसर्गिक म्हणून दावा करताना बाजारात पहावयास मिळतात. इकर च्या नियमांनुसार साबण आणि तत्सम वस्तूंच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख, उत्पादकाचे नाव व पत्ता, परदेशी उत्पादक असेल तर त्याचे नाव व पत्ता, त्यात असलेल्या पदार्थाची त्याच्या उतरत्या क्रमाने सूची, वापरण्याची शेवटची तारीख (बेस्ट बिफोर) आणि साबणात असणारे ऊइश् हे नमूद करणे बंधनकारक आहे. ‘नॅचरल’ किंवा ‘हर्बल’ गोष्टींच्या बाबतीत त्यांचे असणारे प्रमाण बघणे खूपच जरुरीचे असते. म्हणूनच वरील गोष्टी विकत घेताना त्याचा नुसता वास, रूप किंवा जाहिरात या गोष्टींवर अवलंबून न राहता लेबल वाचणे अत्यावश्यक आहे. जो साबण वापरला असता त्वचेवर राहिल्यासारखा वाटतो, त्वचा तजेलदार व मुलायम जाणवते. अति खरखरीत होत नाही, तिच्यावर पुरळ येत नाही किंवा लालही दिसत नाही असे उत्पादन आपल्याला योग्य आहे असे समजावे.