ऑनलाईन टीम / पुणे :
आज अनेक तरुण सामाजिक कार्यामध्ये योगदान देत आहे. समाज अधिक गतीने प्रगती करण्यासाठी याची गरज आहे. सामाजिक कार्य करताना कोणतीही अपेक्षा न ठेवता मिळालेले समाधान अधिक महत्त्वाचे असते, असे मत ज्येष्ठ बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
नारायण पेठेतील प्रगतीशील मित्र मंडळातर्फे कात्रज भिलारेवाडी येथील जनसेवा फौंडेशन, अनाथ व निराधार पुनर्वसन केंद्राला जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. जनसेवा फाऊंडेशनचे डॉ. विनोद शहा, प्रगतीशील मित्रमंडळाचे अध्यक्ष सुबोध ओसवाल, संयोजक योगेश मोहोळ, कार्याध्यक्ष नितीन करडे, प्रविण वडके, संदिप पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिरिष मोहिते, उदय जगताप, मानाचा चौथा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, नितिन पंडित आदी यावेळी उपस्थित होते. सागर चाटोकर, बंडाभाऊ प्रभूदेसाई, सचिन करडे, मंदार जोशी, संतोष जैन यांनी सहकार्य केले.
विद्याधर अनास्कर म्हणाले, प्रगतिशील मित्रमंडळाने अनाथ आणि गरजू मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे केलेले वाटत हा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम आहे. या उपक्रमातून इतर मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.
सानिका टॉईज तर्फे यावेळी पन्नास अनाथ मुलांना खेळण्यांचे वाटप करण्यात वाटप करण्यात आले.