प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या व एलआयसीमधील कर्मचारी राजलक्ष्मी कुलकर्णी व लता कट्टी यांनी कोरोना काळात गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
त्यांनी महात्मा गांधी कॉलनी, टिळकवाडी व समादेवी गल्ली बेळगाव येथील गरीब व निराधार व्यक्ती ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे अशा कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी आशा काकडे इतर महिला उपस्थित होत्या. या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.