इस्लामपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. महाराष्ट्राच्या विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले. माझे त्यांच्याशी अत्यंत कौटुंबिक असे संबंध होते. मा. प्रा. एन. डी. पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राने जन सामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला.