ऑनलाईन टीम / मुंबई :
सायन आणि माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी ही घटना घडली.
सकाळी ऐन गर्दीच्या काळातच रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. घाटकोपर, कुर्ला, ठाणे आणि विक्रोळी स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत तातडीने रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्याने लोकल 15-20 मिनिटे उशीरा धावत आहेत. काही वेळातच ही सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.