बार्शी / प्रतिनिधी
बार्शी शहरांमध्ये आज पासून दहा दिवसाचा सुरू झालेला लॉकडाऊन ची पाहणी करण्यासाठी सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील बार्शी येथे आले होते. यावेळी बार्शी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी बार्शी विषयी काळजी व्यक्त केली. बार्शी शहरांमध्ये आणि तालुक्यामध्ये कोरोना आणि सारी या दोन्ही प्रकारचे रुग्ण वाढत असून त्यात सारी या आजाराचे रुग्ण जास्त वाढत असल्याने बार्शी ची परिस्थिती गंभीर ते कडे जात आहे असे प्रतिपादन केले. यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ सिद्धेश्वर भोरे, बार्शी शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी, बार्शी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष जोगदंड आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बोलताना सांगितले की, बार्शी शहरांमध्ये स्पीड टेस्ट या चालू झाले असून आतापर्यंत साडेतीनशे रुग्णांची टेस्ट घेण्यात आली आहे त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. एकूण रुग्णाच्या 25 टक्के इतके रुग्ण सध्या बार्शी येथे पॉझिटिव निघत आहेत ही काळजी करण्याची बाब आहे . सारी हा आजार जलद गतीने पसरणारा असून याविषयी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. लॉक डाऊन मुळे सारी चा आजार समाजामध्ये पसरण्यास नक्कीच अटकाव होईल मात्र आपल्या घरामध्ये सारी चा आजार आहे की नाही आणि असेल तर तो पसरू नये याबाबत काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधावा अथवा आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार चालू करावा.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की , बार्शी शहरातील सर्व मेडिकल दुकाने आणि दवाखाने यांना आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी आपल्या जवळ दुर्धर आजार असणारे वयोवृद्ध आणि ताप, खोकला अशी जी लक्षणे सारी आणि कोरोना आजाराची आहेत अशी औषधे घ्यायला येणाऱ्या लोकांची यादी बनवावी आणि ती प्रशासनाला तात्काळ कळवावी जर कोणी माहिती दिली नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असेही त्यांनी सांगितले
बार्शी संचारबंदी ची पाहणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली तसेच बार्शी ला जोडणारे सर्व रस्ते बंद केले आहेत की नाहीत याची त्यांनी जातीने पाहणी केली. आणि बार्शीकर नागरिकांनी संचार बंदी चे शंभर टक्के तंतोतंत पालन केले आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून बार्शी करांच्या सजगते चे कौतुक केले.