उपजिल्हाधिकारी, मामलेदार, अबकारी, पोलिसांना सह्यांचे निवेदन.बेकायदेशीर दारुमुळे संसार उध्वस्त झाल्याच्या भावना.
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील ठाणे पंचायत क्षेत्रातील सुरला याठिकाणी गावांतील लोकांनी एकतेची वज्रमूठ घट्ट आवळून गावातील सर्व दारूची दुकाने बंद केली होती. यामुळे सदर गावात शांतता निर्माण झालेली आहे. सत्तरी तालुक्मयातील अनेक गावांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे. सुरला गावातील नागरिकांचा आदर्श घेऊन आज सालेली गावातील नागरिक व खासकरून महिला भगिनी पुढे सरसावल्या असून त्यांनी गावातील बेकायदेशीररित्या विक्री केली जाणारी दारूची दुकाने त्वरित बंद करावी अशा प्रकारची मागणी पुढे केली आहे. आज त्यांनी सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस निरीक्षक व अबकारी खात्याच्या निरीक्षकांना निवेदन सादर करून सदर बेकायदेशीर दारू विक्री त्वरित बंद करण्याची मागणी केली. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशाप्रकारचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता सत्तरी तालुक्मयातील नागरिक व खासकरून महिला भगिनी दारूच्या दुष्परिणामांमुळे संसारावर होणारे गंभीर परिणाम यामुळे जागृत होऊ लागल्या असून हे येणाऱया काळासाठी चांगली बाब असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
सहा वर्षापासून बेकायदेशीर दारू विक्री.
दरम्यान मोठय़ा प्रमाणात या गावातील नागरिक व खासकरून महिला भगिनी वाळपई शहरात येऊन या संदर्भात निवेदने वेगवेगळे अधिकाऱयांना सादर केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महिला भगिनींनी सांगितले की गेल्या सहा वर्षापासून गावांमध्ये सहा ठिकाणी बेकायदेशीररित्या दारूविक्री होत आहे. यामुळे गावांमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे. याच संदर्भात तक्रारी गेल्या सहा वर्षापासून नागरिक सातत्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱयांना तक्रार करीत आहे. मात्र त्याची अजिबात दखल न घेतल्यामुळे नागरिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. बेकायदेशीरपणे दारू विक्री होत असताना वाळपई याठिकाणी अबकारी खात्याची यंत्रणा कार्यरत असताना अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात अशा प्रकारचा सवाल यावेळी करण्यात आला. खाते सक्रिय असताना जर बेकायदेशीर दारूविक्री होत आहे तर मग खाते असून काय फायदा असे यावेळी महिला भगिनींनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
अशांततामुळे रात्रभर झोप नाही .
गेल्या सहा वर्षांपासून या गावामध्ये बेकायदेशीरपणे होणारी दारूची विक्री यामुळे गावांमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे .रात्री उशिरापर्यंत दारू झोकून धि?गाणा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे या भागातील नागरिकांची निद्रानाश होताना दिसत आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. असे प्रकार असहाय्यपणे सहन करावे लागत असल्याचे महिला भगिनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले .आता या भागातील नागरिकांचा संयम सुटला असून सादर करण्यात आलेल्या निवेदनानंतर यासंदर्भात गांभीर्याने कारवाई न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशाप्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे.
बेकायदेशीर दारु विपेत्यांकडून धमक्मया.
बेकायदेशीर दारू विक्री संदर्भात वेगवेगळय़ा ठिकाणी तक्रार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर या विपेत्याकडून नागरिकांना धमक्मया देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी नागरिकांनी स्पष्ट केले आहे. आपण तक्रार केली तरीसुध्दा त्याचा काहीच फायदा होणार नसल्याचे या विपेत्यांचे म्हणणे असून यामुळे सरकारच्या यंत्रणेला गृहीत धरण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी महिला भगिनींनी स्पष्ट केले.
अनेक संसार उद्ध्वस्त
अशाप्रकारे बेकायदेशीर दारू विक्री होत असल्यामुळे गावातील अनेक संसार आज उध्वस्त झालेले आहेत. घरातील कर्ता करविता दारूच्या आहारी गेल्यामुळे कुटुंबाचे जगणे मुश्कील होऊन बसले असून यामुळे मुलांचे शिक्षण वाया जाऊ लागलेले आहे. शिक्षणासाठी खर्च करणे अनेक कुटुंबांना अशा प्रकारामुळे दुरापास्त होऊ लागले असून असे अनेक संसार उद्ध्वस्त करणारी प्रक्रिया गावांमध्ये हवीच कशाला अशाप्रकारचा सवाल या भागातील महिला भगिनी केला आहे. यागावात कायदेशीर दारूविक्री नकोच मात्र बेकायदेशीर दारू विक्रीला सरकारने त्वरित आळा घालावा अशा प्रकारचे मागणी करण्यात आलेली आहे.
अनेक अधिकाऱयाना निवेदने सादर.
आज मोठय़ा प्रमाणात सालेली गावातील नागरिकांनी वाळपईशहरात येऊन उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार वाळपई अबकारी खात्याचे निरीक्षक व वाळपई पोलीस निरीक्षक यांना निवेदने सादर केली .त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अबकारी निरीक्षक हनुमंत देसाई यांनी सांगितले की या गावातील नागरिकांकडून बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची लेखी तक्रार सादर करण्यात आलेली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार असून पुन्हा एकदा या भागातील नागरिकांची तक्रार येणार नाही याची आपण दखल घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण या पदाचा ताबा आजच घेतला असून यापूर्वी यासंदर्भात तक्रारी आल्या की नाही यासंदर्भात ते आपल्याला माहिती नाही मात्र आपल्याकडे आलेल्या तक्रारीची निश्चित प्रमाणात गांभीर्याने दखल घेण्यात येईल असे यावेळी देसाई यांनी स्पष्ट केले.