मंत्री मायकल लोबो यांचे प्रयत्न सफल
गोवा स्वातंत्र्यावेळी अवघीशी सात लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात साल 1980 पासून व्यवसायिक पर्यटनाची सुरुवात झाली आणी डोळय़ांची पाती लवते न लवते तोच आजच्या घडीस हीच जनसंख्या आज सोळा लाखाच्या घरात येऊन पोहैचलेली आहे. तीस पस्तीस वर्षापुर्वी प्रत्येक घरातील कचरा मग तो ओला असो अथवा सुका घरगडी किंवा घरमालक घराच्या मागील बाजुस एक खड्डा खणून एकतर त्यांत गाढायचा किंवा जाळून टाकायचा. मला आठवते आमच्या घरचा सुका कचरा आई संध्याकाळी एकत्रित करून बहुतेक तो जाळून टाकायची आणी ओला कचरा शेजारच्या घरात घरगुती पोसलेल्या डुकरासाठी धोंण म्हणून देऊन टाकायची. त्यामुळे आजच्यासारखी कचर्याच्या विषयावरून ना कुठले वाद व्हायचे ना कुठली भांडणे व्हायचीत. दरम्यान, काळ बददला, माणसे बदलली, पर्यटन मोठय़ा प्रमाणात व्यवसाय म्हणून राज्यात जोर धरुं लागले आणी हां हां म्हणता कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न डोके वर काढुं लागला. घरचा कचरा, गावागावातील रेस्टॉरंट्ससचा कचरा आणी मोठमोठय़ा हॉटेल्स तसेच रिसॉटमधुन निर्माण होणारा कचरा राज्याची डोकेदुखी होऊन एक मोठी समस्या म्हणून एकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर राज्य सरकारपुढे मोठा यक्षप्रश्न बनून उभा राहिला. दरम्यानच्या काळात दक्षिणेतील सोनसोडो परिसर दुर्गधीचे आगर बनून स्थानिक जनतेला भेडसावू लागले आणी स्थानिक सरकारच्याही नाकात दम आणुं लागले. दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस उग्र होणारी कचर्याची समस्या पाहाता सरतेशेवटी सरकारकडून कळंगुटचे आमदार तथा विकास कामात अग्रेसर असलेल्या मायकल लोबो यांच्या पुढाकाराने राज्यात प्रथमच सांळगांव पठारावर राज्यातील प्रथमच 100 टन क्षमतेचा कचरा प्रकल्प उभा केला. सुरवातीला थोडाफार विरोध झालेला येथील प्रकल्प तत्कालीन कळंगुटचे आमदार आणी आताचे मंत्री असलेल्या मायकल लोबो यांनी आपल्या नेतृत्व गुणांच्या आधारे तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा विश्वास संपादन करून राज्यातील पहिल्यावहिल्या भव्य अशा कचरा प्रकल्पाची मुहूर्त मेढ 2012 साली सांळगावच्या पठारावर रोवण्यात यश मिळवीले. अंदाजे 376 कोटी रुपये खर्चुन राज्यातीलच नव्हे तर सबंध देशातील अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज असा हा एकमेव कचरा प्रकल्प अआहे. आजच्या घडीस सुमारे शंभरहून अधिक टन कचर्यावर येथील प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. दरम्यान, येथील कचरा प्रकल्पास विरोध करणार्यांनीही काळानुसार नमते घेत राज्यातील उग्र कचरा समस्येवर सांळगावचा प्रकल्प म्हणजे रामबाण उपाय असल्याचे मान्य केले. सांळगांवच्या प्रकल्पापाठोपाठ आता सरकारचे लक्ष्य तिसवाडीतील बायंगिणी तसेच दक्षिणेतील काकोडा येथे होऊं घातलेल्या अन्य प्रकल्पांकडे वळलेले आहे किंबहुना दक्षिणेतील काकोडा येथील कचरा प्रकल्पाची पायाभरणी समारंभ माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जन्मदीनाचे औचित्य साधुन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते 13ःडिसेंबर 2019 ला झाला. अंदाजे 173 कोटींचा हा प्रकल्प लॉकडाऊनमुळे थोडाफार रखडलेला असला तरी येत्या एक दोन वर्षात जनतेच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. दरम्यान, काकोडा पाठोपाठ तिसवाडीतील बायंगिणी येथील अंदाजे अडीचशे कोटींच्या कचरा प्रकल्पाची प्राथमिक तयारी पुर्ण झालेली आहे येथील प्रकल्प पुर्ण होताच अर्ध्या अधिक राज्याची कचरा समस्या कायमची सुटणार असल्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांचे म्हणणे आहे, याकामासाठी सरकारबरोबर जनतेचाही सहभाग तितकाच महत्वाचा असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. दरम्यान, गोमंतकातील एकुण 186 पंचायतींना घरोनघर कचरा गोळा करण्यासाठी सरकारी आर्थिक मदत मिळत आहे. ज्या पंचायतींना स्वताचे वाहन खरेदी करणे अशक्मय आहे अशा पंचायतींसाठी सरकारचे कचरा व्यवस्थापन खाते स्वता पुढाकार घेत वाहने खरेदी करून देण्यासाठी तत्पर असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. आज घरोनघर कचरा कामगार लोकांकडून गोळा केला जात आहे त्यामुळे अनेकांची कचरा समस्या घरबसल्या आता सुटु लागली आहे यापुढे यद्ययावत यंत्रणेचा उपयोग करीत प्रत्येक घरातील कचरा आपोआप मशीन द्वारा किचनपासून सरळ गार्बेज ट्रकमध्ये अनलोड करण्यासाठी विदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले….