तिळारी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे साळात पाणी वाढले. भुमिका देवीच्या मंदिरासह एका घरात पाणी. साळातील पुर परिस्थितीला सरकारच जबाबदार. मेघश्याम राऊत यांचा आरोप.
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील साळ या गावावर यावषीही महापुराची टांगती तलवार असून त्याची झलक काल बुधवारी दिसून आली. तिळारी धराणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने शापोरा नदीची पातळी बऱयाच प्रामाणात वाढत आहे. परिणामी साळ गावात पाणी भरू लागले आहे. बुध. दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळीनंतर गावातील भुमिका देवीच्या मंदिरात पाणी शिरले होते. तसेच या परिसरातील एका घरातही पाणी शिरले होते. व संपूर्ण परिसर जलमय झाला होता. यावषी साळ गावात येणाऱया संभाव्य पुराला सरकारच जबाबदार आहे, असा आरोप साळ गावातील युवानेते मेघश्याम राऊत यांनी केला आहे.
साळ या गावात गेल्यावषी महापुर आला होता. त्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना रातोरात स्थलांतर व्हावे लागले होते. त्यामुळे घरातील सामानांचीही मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानी झाली होती. तसेच साळ गावातील शेती बागायतींचीही मोठी हानी झाली होती. हातातोंडाशी आलेले पीक ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर उध्वस्त झाले होते. त्या लोकांना यावेळी गणेश चतुर्थीपूर्वी नुकसानभरपाईचा एक हप्ता मिळाला होता. मात्र त्यानंतर अनेकांना काहीच मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. यावषीही तीच परिस्थिती उदभवल्यास कोणाकडे बघायचे या विवंचनेत सध्या साळ गावातील शेतकरी वर्ग सापडला आहे.
सकाळीपासून गावात वढू लागले पाणी
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र धो धो पडणाऱया पावसामुळे सर्वत्रच लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच अविश्रांत पडणाऱया पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. डिचोली तालुक्मयातील बहुतेक सर्वच नद्या दुथडय़ा भरून वाहत आहे. साळ गावातून वाहणाऱया शापोरा या नदीला पावसात मोठय़ा प्रमाणात पाणी असते. मात्र तिळारी धरणाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर या नदीची पातळी कितीतरी पटीने वाढते. सध्या डोंगरमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तिळारी धरण गेल्या अनेक दिवसांपूर्वीच पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या धरणातील अतिरिक्त पाणी कोणत्याही क्षणी सोडण्यात येणार असल्याने सतर्कता बाळगवी अशी सुचना धरण अधिकारणीने काहीच दिवसांपूर्वी दिली आहे. त्याचप्रमाणे सदर धरणातील अतिरिक्त पाण्याचा काल बुध. दि. 5 रोजी विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शापोरा नदीची पातळी बऱयाच प्रमाणात वाढली. पाणी या नदीच्या बंधाऱयांवर असलेल्या पदपुलावरून वाहू लागले. आणि साळ गावातही पाणी शिरले. दुपारपर्यंत साळ गावातील देवी भुमिकाच्या मंदिरात पाणी आले होते. तसेच परिसरातही मोठय़ा प्रामाणात पाणी साचले होते. साळ धुमासे रस्ता ठप्प झाला होता. मंदिराच्या परिसरात असलेल्या एका घरातही पाणी भरले होते.
संध्याकाळी पाणी काही प्रमाणात ओसरले
सकाळीपासूनच तिळारी धरणातील पाणी सोडण्यात येत असल्याने शापोरा नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी वाढले. परिणामी साळ गावतही पाणी शिरले होते. दुपारी नदीला भरती असल्याने नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पाणी गावात शिरले होते. मात्र संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तसेच नदीची भरतीही ओसरल्याने गावात साचलेले पाणी संध्याकाळी हळू हळू ओसरू लागले होते.
सभापती, मामलेदार, माजी आमदारांकडून पाहणी.
साळ गावातील पुरस्थितीची सभापती तथा डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी जलस्रोत खात्याच्या अभियंता व अधिकारी वर्गांसह पाहणी केली. गावातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व ती खबरदारी घ्यावी. तसेच सर्व त्या आपत्कालीन उपाययोजना तैनात ठेवाव्यात अशी सुचना सभापती राजेश पाटणेकर यांनी उपस्थित अधिकाऱयांना केली. डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यंनीही साळ गावात जाऊन पाहणी केली. पाणी जास्त प्रमाणात वाढल्यास आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार नरेश सावळ यांंनीही साळ येथे भेट देऊन लोकांची विचारपूस केली. माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटय़े यांनी साळ येथे भेट देऊन लोकांशी संवाद साधला. व लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
सार गावातील पुराला सरकारच जबाबदार. नुकसानी झाल्यास सोडणार नाही.
साळ गावात गेल्यावषी आलेल्या महापुरातून सरकारने बोध घेऊन यावषी खबरदारी घेणे गरजेचे होते. मात्र सरकारकडून या गंभीर घटनेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी सरकारच्या वेधशाळेने जोरदार पावसाची शक्मयता वर्तविली होती. जोरदार पाऊस पडण्याची शक्मयता असताना तिळारी धरणातील पाण्याचा काही प्रमाणात साठा खाली करून घेता आला असता. मात्र गोवा राज्याच्या जलस्रोत खात्याला त्याचे काहीच पडून गेलेले नसून त्यांनी त्यादृष्टीने काहीच केले नाही. गेल्यावषी पुरामुळे लोकांचे मोठय़ा प्रमाणात शेती बागायती व घरांचेही नुकसान झाले होते. त्यांना तुटपुंजी नुकसानभरपाई देण्यात आली. तर नूकसानभरपाईदाखल मंजूर करण्यात आलेला निधी कुठे गेला ? यावषी जर या पुरामुळे साळ गावातील लोकांच्या पिकांचे, बागायतींचे जर नुकसान झाले तर सरकारारकडून एक एक पैशाची नुकसानभरपाई मिळवून घेणार. त्याशिवाय सरकारला सोडणार नाही, असा इशारा साळ गावातील युवानेते तथा काँग्रेसचे गट अध्यक्ष मेघश्याम राऊत यांनी दिला आहे.