मनोज पवार / दापोली :
दापोली तालुक्यातील देगाव परिसर व कर्जत तालुक्यातील कोंडिवडे येथील शिक्षणापासून वंचित सावित्रीच्या लेकींच्या जीवनात शिक्षणरुपी तांबडफुटीसाठी `बांधिलकी’ ही सामाजिक संस्था 39 वर्षे अविरतपणे कार्यरत आहे. 39 वर्षांपूर्वी दोन मैत्रिणींना सुरू केलेल्या या `बांधिलकी’ला आज 27पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचे बळ लाभले आहे. या सर्वांच्या अथक सांघिक प्रयत्नांमुळे 2 हजारपेक्षा अधिक सावित्रीच्या लेकींच्या जीवनात शिक्षणाचे तांबडे फुटले आहे.
दारिद्रÎाने पिचलेल्या व शिक्षणापासून वंचित लहान मुलींपासून परित्यक्ता व विधवा स्त्रियांर्यंत अनेकांना स्मिता जोशी यांच्या `बांधिलकी’ या संस्थेने आत्मनिर्भर केले आहे. त्यांचा हा सेवायज्ञ वयाच्या 88व्या वर्षीदेखील धगधगता आहे. ‘बांधिलकी’ने आज महिला शिक्षणात डोंगराएवढे कार्य केले आहे. पूर्वी लहान मुलींनादेखील शिक्षण घेणे दुरापास्त होते. याकरिता त्या संस्थेच्या माध्यमातून मुलगी शाळेत आल्यास दररोज 1 रुपया किंवा महिन्याला 30 किलो धान्य देत असत. या 1 रुपया किंवा 30 किलो धान्यामुळे पालक त्यांना शाळेत पाठवत असत. यातून `बांधिलकी’ने देगाव परिसरात मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढवला. त्यांचे असे प्रयत्न 1981 पासून 1995 पर्यंत सुरू होते. यानंतर शासनाच्या मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षण धोरणामुळे मुलींच्या शिक्षणाचा टक्का आपोआप वाढला. मग `बांधिलकी’ने मुलींच्या महाविद्यालयीन व पदय्युत्तर शिक्षणासाठी रोख शुल्क देण्यास सुरुवात केली. यामुळे देगाव परिसरातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा टक्काही वधारला. यातील अनेक मुली आज विविध पर्दावर समर्थपणे कार्यरत आहेत.
शिक्षणाच्या नुसत्या गप्पा मारून किंवा घोषणा करून काही होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती लागते हे `बांधिलकी’sने दाखवून दिले आहे. या संस्थेच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थिनी आपल्या पायावर उभ्या राहून ताठ मानेने जगत आहेत. ही संस्था मुख्यत्वे मिळणाऱया देणगीतून मुलींच्या शिक्षणाचा खर्च करते. डॉ. विजयाताई लाड यांच्यासारख्या व्यक्तीदेखील या संस्थेशी निगडीत आहेत. शिक्षणप्रेमी व दानशूरांकडून जमणाऱया निधीतून संस्था विद्यार्थिनी घडवण्याचे व समाज सुदृढ करण्याचे काम अविरतपणे करत आहे.
विद्यार्थिनींकडून बचतीमधील हिस्सा संस्थेला
बांधिलकी संस्थेने रायगड जिह्यातील कर्जत, कोंडिवडे गावात फार मोठे कार्य उभारले आहे. येथील 2 हजारपेक्षा अधिक आदिवासी मुलींच्या जीवनाला यातून दिशा मिळाली आहे. या मुली नोकरीला लागल्यावर संस्थेप्रती आपली `बांधिलकी’ विसरत नाहीत. या मुली ही आपल्या बचतीमधील काही हिस्सा दरवर्षी संस्थेच्या कामाला दान करतात. यातून अन्य मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था होते.
संवाद सलोख्याचे
मुलं आणि मुली वयात येताना त्यांच्यातील निकोप संवाद वाढावा, एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा याकरिता संस्थेकडून `संवाद सलोख्याचे’ आयोजन करण्यात येते. यामध्ये नववी, दहावीतील मुलं व मुली एकत्र बसवून त्यांच्यात मुक्त चर्चा घडवून आणली जाते. हा उपक्रम गेली सहा वर्ष सुरु आहे.
भगिनीं संवाद
खेडेगावातील मुलींनी शहरी व शहरातील मुलींनी खेडेगावातील जीवन अनुभवावं यासाठी दापोली तालुक्यातील मुलींना कर्जत- कोंडीवडे येथे नेण्यात येते. यामध्ये आयएएस, आयपीएस, एमपीएससी, पोलीस झालेल्या मुली येतात. त्या मुलींची संवाद साधतात. दहावी, बारावी नंतरच्या करियर बाबत देखील सजग करतात.
संस्थेचे आधारस्तंभ
यावर्षी कोरोनाचा कहर झाल्यामुळे संस्थेचे काही उपक्रम स्थगित आहेत. `बांधिलकी’च्या माध्यमातून येथील अंगणवाडÎांना खाऊ देण्यात येतो. विधवा, परित्यक्ता स्त्राrयांसाठी समुपदेशन करण्यात येते. संस्थेची 32 गाव परिसरामध्ये एक रुग्णवाहिका कार्यरत आहे. स्मिता जोशी यांचे भाऊ अशोक गोंधळेकर हे दापोलीमध्ये त्याचे काम पाहतात. त्यांना जयश्री पाटणकर सहाय्य करतात. स्मिता जोशी व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कन्या वृशाली कान्हेरे यांनीही संस्थेच्या कर्यात झोकून दिले आहे.