कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचे प्रतिपादन
वार्ताहर/ पणजी
लोकमनाला जागृत करण्याचे काम साहित्यिक आपल्या साहित्यातून करित असतात. त्यामुळे कसदार साहित्य रचणाऱया साहित्यिकाला समाजात मोठा मान असतो, असे उद्गार गोव्याचे कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी माशेल येथे बोलताना काढले.
माशेल येथे आयोजित कार्यक्रमात कुमूद भिकू नायक यांच्या ‘भुरगी म्हजीं गुणाची’, ‘शाणो कोण’, ‘एकवटाचे बळगे’ आणि ‘पाडेली रे पाडेली’ या चार कोकणी पुस्तकांचा प्रकाशन सोहळय़ा समयी प्रमूख पाहुणे म्हणून गावडे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खास पाहुणे म्हणून डॉ. भुषण भावे, बेतकी-खांडोळा पंचायतीचे सरपंच दिलीप नायक, साहित्यिक कुमूद भिकू नायक आणि प्रकाशन भिकू बोमी नायक हजर होते.
मंत्री गोविंद गावडे पुढे बोलताना म्हणाले आज देशाची संस्कृती भरकटत चालली आहे. याला काहींअंशी सोशल मिडीया जबाबदार आहे. आमच्या संस्कृतीची राखण आम्हीच केली पाहिजे. साहित्यिक आपल्या साहित्यातून नेहमी हे काम करीत असतात.
कुमूद नायक यांनी बाल साहित्यिक म्हणून दर्जेदार साहित्य निर्माण करून नाव मिळवले. साहित्य अकादमीने त्याच्या पुस्तकाला पुरस्कार देवून त्याना सन्मानीत केले आहे. त्या साठी लेखिकेचे अभिनंदन करून भविष्यात आणखीन दर्जेदार साहित्य निर्मीती करावी असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. भुशण भावे बोलताना म्हणाले कुमूद नायक यांनी दर्जेदार आणि कसदार असे साहित्य निर्माण करताना लहान मुलांच्या मनाचा ठाव घेवून संस्कारी साहित्य रचले. त्या मुळेच बाल साहित्यिक म्हणून त्या मोठय़ा होत आहेत. बाल साहित्याच्या वेगवेगळय़ा प्रकारात साहित्य निर्मिती त्यानी करावी असेही डॉ. भावे म्हणाले.
यावेळी बेतकी खांडोळा ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप नायक यांचे भाषण झाले. लेखीका कुमूद नायक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सुरवातीला भिकू बोमी नायक यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते चार पुस्तकाचे प्रकाशन झाले. शेवटी प्रथमी नायक यांनी आभार मानले. आणि कनिश्का नायक यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. लता नायक यांनी केले.
या कार्यक्रमास कोंकणी अकादमीचे अध्यक्ष अरूण साखरदांडे, नारायण मावजे हजर होते.