प्रतिनिधी /पणजी
अलीकडेच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेले कोकणीतील ज्येष्ठ कवी, लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव वेरेंकर यांची विशेष मुलाखत आज बुधवार दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.10 वाजता पणजी दूरदर्शनवरुन प्रसारित करण्यात येणार आहे. मुलाखतकार तथा पत्रकार राजू भिकारो नाईक यांनी ही मुलाखत घेतली असून पणजी दूरदर्शनचे निर्माते राजेंद्र नरसिंह फडते यांनी निर्मिती केली आहे. संजीव वेरेंकर यांच्या एकंदरीत साहित्य, कोकणी चळवळ, पत्रकारिता तसेच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेल्या त्यांच्या रक्तचंदन या काव्यसंग्रहावर या मुलाखतीत चर्चा करण्यात आली आहे. गोव्यातील साहित्य, संस्कृती, सामाजिक क्षेत्राबाबतही त्यांनी आपली मते व्यक्त केली आहे.