ओटवणे/ प्रतिनिधी-
तेरेखोल नदीच्या महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून ओटवणे दशक्रोशित यापूर्वीही गरजूंना मदत करण्यात आलेली आहे. तसेच परीसरात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
त्यामुळे या भागात पुराचे संकट ओढवल्याने विलवडे गावातील १२, ओटवणे गावातील ६, सरमळे गावातील एका अशा एकूण १९ कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. संस्थेचे मुंबई येथील अध्यक्ष रुपेश परब यांनी सरमळे, ओटवणे, विलवडे या तिन्ही गावातील पूर हानीची माहिती घेत पूरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तू वितरण करण्याचा निर्णय घेतला. रूपेश परब यांच्या सूचनेनुसार संस्थेचे पदाधिकारी सिध्देश गवस, हेमंत परब, श्रीधर परब यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.