मध्यप्रदेशातील 1 हजार 13 मजूर स्वगृही रवाना
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :
लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने जिल्हय़ात अडकलेल्या मजूर, कामगारांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी राज्य व जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे तिसरी श्रमिक विशेष रेल्वे मध्यप्रदेशातील जबलपूरकडे रवाना झाली. जिल्हय़ातून एकूण 1 हजार 16 मजूर व कामगार या रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना झाले. यावेळी मजुरांच्या चेहऱयावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.
यावेळी प्रवाशांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व कामगार व मजुरांची वैद्यकिय तपासणी करून पाण्याची बाटल्या, मास्क, साबण व फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. जिल्हय़ातील आठ तालुक्मयातील 910 व रत्नागिरी जिल्हय़ातील राजापूर तालुक्मयातील कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. यामध्ये कुडाळ तालुक्मयातील 96 व्यक्ती सात बसगाडय़ांमधून, देवगड तालुक्मयातील सात व्यक्ती एका गाडीतून, मालवण तालुक्मयातील 239 व्यक्ती 12 गाडय़ांमधून, कणकवली तालुक्मयातील 267 व्यक्ती 12 गाडय़ांमधून, सावंतवाडी तालुक्मयातील 96 व्यक्ती चार गाडय़ांमधून, दोडामार्ग तालुक्मयातील 93 व्यक्ती पाच गाडय़ांमधून, वैभववाडी तालुक्मयातील 35 व्यक्ती दोन गाडय़ांमधून, वेंगुर्ले तालुक्मयातील 77 व्यक्ती चार गाडय़ांमधून, तर रत्नागिरी जिल्हय़ातील राजापूर तालुक्मयातील 103 व्यक्ती पाच गाडय़ांमधून अशा एकूण 52 एस. टी. बसमधून या सर्वांना सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानकात आणण्यात आले. या वाहतुकीवेळी सामाजिक अंतराचे पालन करीत या सर्वांना त्यांची तिकिटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक, स्टेशन मास्तर वैभव दामले, देवगडचे नायब तहसीलदार प्रदीप पवार आदी उपस्थित होते. रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.